शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी का घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 07:00 IST

Ashadhi Ekadashi 2024: विठोबा कधीच शिळा होत नसतो की त्याच्याप्रती असलेला भावदेखील शिळा होत नाही, तरी ही प्रथा कशासाठी? वाचा...

शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, ऐकावं ते नवलंच! पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. शिळा विठोबा अशी संकल्पना आपण याआधी क्वचितच ऐकली असेल. पण जेव्हा आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सान्निध्यात बसतो, तेव्हा अशा अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होतो. तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन घेण्याआधी जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल!

आषाढी एकादशीचा दिवस तसा धामधुमीचा! पूर्वी लोक आषाढीचा उत्सव झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाताना दिसत. एवढ्या सकाळी ते तिथे का जात असावेत असा एका आजींना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'ते सगळे शिळ्या विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले आहेत.' 

वास्तविक विठोबा कधीच नवा, जुना किंवा शिळा होत नसतो. तो कधीही बघा, राजस सुकुमारच दिसतो. मग शिळा विठोबा ही संकल्पना आली कुठून ? तर भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावातून! भाविक मनुष्य जे जे आपल्याला आवडतं ते देवाला अर्पण करतो. मग ती शिळी भाकरी का असेना. संत देखील याच भोळ्या भावनेने देवाला न्हाऊ, माखू घालत, देवाचा साज शृंगार करत, देवाला नेसायला वस्त्र, झोपायला गादी, लोड, पांघरूण, जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही देत असत; नव्हे अर्पण करत असत. 

असाच हा शिळा विठोबा, त्यांच्या मनातला, संकल्पनेतला! जो आषाढीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल. दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल आणि अशा वेळी त्या थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी त्याला पेलाभर पाणी, दूध, तुळशीची माळ अर्पण करून दर्शन घ्यावं, असा नियम भाविकांनी आखला असेल. म्हणून आषाढीच्या दिवशी विठोबाचे दर्शन तर घेतातच, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दमलेल्या विठोबाचे अर्थात शिळ्या विठोबाचेही दर्शन घेतात. 

या छोट्याशा कृतीतून मोठा धडा मिळतो, तो म्हणजे माणुसकीचा! आपली संस्कृती केवळ मूर्तिपूजा शिकवत नाही तर मूर्तिपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते. जशी विठोबाची चौकशी कराल तशी आपल्या माता पित्याची, सगे सोयऱ्यांची, आजूबाजूच्या लोकांची आपुलकीचे चौकशी करा. त्यांना हवं नको ते द्या. मृत्यूनंतर आपल्या नावे दानधर्म करण्याआधी जिवंतपणी शक्य तेवढी मदत करा. एकमेका सहाय्य्य करू, अवघे धरू सुपंथ!

'भोळा भाव आणि देवा मला पाव' असा सच्चा भाव बघून देव का बरे प्रसन्न होणार नाही? आजच्या बेगडी जगात एवढी निरागसता बघायला मिळत नाही. जिथे तिथे फोटो काढून आपल्या भाव भावनांचे प्रगटीकरण करायचे आणि जगाला दाखवायचे असा ट्रेंड आला आहे. मात्र आपली आजी, पणजी कुणी बघावं म्हणून नाही, तर आपल्याला जाऊन देवाला बघता यावं यासाठी देवदर्शन घेत असत. परिणामी देवाचेही त्यांच्याकडे लक्ष असे. आपणही तेवढा निर्मळ भाव आणण्याचा प्रयत्न करूया आणि (आता जमलं नाही तर जमेल तेव्हा) शिळ्या विठोबाचे दर्शन घेऊया. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी