शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Ashadhi Ekadashi 2024: ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला 'अशी' करा सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 07:00 IST

Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठप्राप्ती होते आणि महापुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यासाठी ही सविस्तर माहिती.

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढी पासून या व्रताची सुरुवात करायला हवी. त्याबद्दल अधिक वाचा. 

एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो. 

एकादशीचा संकल्प:

या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.

एकादशी व्रताची समाप्ती: 

कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते. मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. 

एकादशीची नावे :

प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. 

ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत असे श्रेयस कुलकर्णी लिहितात. 

आषाढी एकादशी जवळच आहे. ज्यांना एकादशी चे व्रत घ्यायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेला आहे. 

१. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारिरीक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही.२. एकादशी करणाराला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. ३. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवतेशी जोडले जाणे.४. एकादशी करणाराचे पूर्वकर्म शुद्ध होते.५. एकादशी करणाराची एकाग्रता वाढते. ६. एकादशी करणाराला अन्नाची खा खा होत नाही, परिणामतः झोप सुद्धा परिसिमित राहते, विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. 

एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात. त्याने ती बारा वर्षे प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अंबरीष, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण करून आपला उत्कर्ष साधूया. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३