शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

...आणि चिखलात रुतलेला हत्ती सुखरूप बाहेर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:00 IST

भूतकाळात संकटकालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल. 

एका राजाकडे त्याचा खास हत्ती होता. त्याचे नाव होते बाला. धिप्पाड देहाचा बाला, युद्धभूमीवर गेला की शत्रूला धडकी भरे, अशी त्याची ऐट होती. आजवर त्याच्यामुळे राजाने अनेक युद्धात, तहात यश मिळवले होते. विजयश्री मिळाल्यावरदेखील राजा बालावर चढवलेल्या अंबारीवर बसून राज्यात प्रवेश करत असे. 

वयपरत्वे बाला थोडा थकत चालला होता. परंतु, राजाचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याला आधीसारखाच मानसन्मान आणि राजेशाही थाट मिळत असे.

एक दिवस बालाला फिरवण्यासाठी सैनिक त्याला तळ्याकाठी घेऊन गेले. पाण्यात आंघोळ घालण्याच्या हेतूने त्यांना बालाला पुढे नेले, पण तळ्याकाठी भरपूर चिखल साचल्याने बालाचा पाय चिखलावरून सरकत खोल रुतून बसला. सैनिक त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते. स्वत: बाला देखील प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नव्हता.

ही बातमी राजाला कळली तर आपली काही खैर नाही. म्हणून घाबरलेले सैनिक प्रधानाकडे गेले. त्यांना विनंती केली आणि वाचवा असे म्हणाले. चतुर प्रधानाने तळ्याच्या चहुबाजूंनी रणवाद्ये वाजवायला सांगितली. ढोल, नगारे, दुदुंभी अशा रणवाद्यांनी जंगलाचा परिसर दुमदूमुन गेला. प्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे रणवाद्यांचा असर झाला आणि बाला उसळी मारून सर्वशक्तीनिशी चिखलातून बाहेर पडला. सैनिकांनी त्याला स्वच्छ धुवून काढले. झुल पांघरली आणि राजेशाही थाटात परत आणले.

राजाला ही वार्ता कळली. त्याने प्रधानाचे आभार मानले व रणवाद्यांचे प्रयोजन विचारले. त्यावर प्रधान म्हणाला, `राजेसाहेब बाला सामान्य हत्ती नाही, तर तो योध्दा आहे. त्याला रणवाद्य ऐकण्याची सवय असल्याने तो आवाज ऐकून त्याचे बाहू स्फुरण पावले आणि गर्भगळीत झालेला बाला सुखरूप बाहेर आला.'

बालासारखेच आपणही अनेकदा संकटाच्या चिखलात रुतून बसतो, गर्भगळीत होतो. अशावेळी आपण भूतकाळातील जिंकलेल्या युद्धप्रसंगांचा आढावा घेतला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल.