शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 19:35 IST

Anant Chaturdashi 2022: बाप्पा येण्याचा आनंद आणि तो जाण्याचे दुःखं शब्दात मांडता येणार नाही, पण निरोप हा दिलाच पाहिजे कारण... 

विरह वाईटच! मग तो व्यक्तीचा असो, नाहीतर बाप्पाचा! दरवर्षी बाप्पाचं असं असं पाठ दाखवून जाणं जिव्हारी लागतं! तो येताना भरपूर आनंद घेऊन येतो आणि जाताना भरपूर आशीर्वाद देऊन जातो, हे मान्य, पण त्याने गेलंच पाहिजे का? खरं तर हो! 'अतिपरिचयात अवज्ञा' असं सुभाषितकारांनी लिहिलंय. आपण काय, बाप्पाला कायमस्वरूपी जवळ ठेवून घेतलं असतं. पण तसं झालं तर प्रत्येक बाबतीत त्याला गृहीत धरलं जाईल. मागण्या मान्य झाल्या तर लाडी गोडी, नाही झाल्या तर रोषाचा धनी ठरवलं जाईल. आपली बकेट लिस्ट न संपणारी आहे. ती पूर्ण करण्यासाठी बाप्पाने आपल्याला सक्षमदेखील केलं आहे. तरी त्याने आपल्याला सोडून जावं असं वाटत नाही. 

निरोप देताना येणारा गहिवर थांबवता येत नाही. जाणारा आपल्या गावी परत जाणार या आनंदात असतो, मात्र निरोप देणारा रिकामं घर, रिकामं मन आणि गत क्षणांमध्ये झुरत राहतो. बाप्पा जाताना आपलीही अवस्था अशीच होते. पण विरहाशिवाय मिलनाचा आनंद तरी कसा अनुभवणार? बाप्पाच्या आगमनासाठी आपण एवढे उत्सुक असतो की बाप्पा जाता जाताच पुढच्या वर्षी किती तारखेला येणार  पाहून ठेवतो. तो येण्याच्या दीड दोन महिने आधीपासून गावचे तिकीट, मूर्तीची नोंदणी, उत्सवाच्या तयारीला उधाण येते. लोक जमतात, गप्पा, गोष्टी, नाच, गाणी, चेष्ठा, मस्करी करत गुण्या गोविंदाने नांदतात. आपापसातील मतभेद  काळासाठी विसरून जातात. एकसुराने एक दिलाने बाप्पाची आरती म्हणतात, गजर करतात, मोदकाचा आस्वाद घेतात. 

बाप्पा आपल्याकडे पाहुणचार घ्यायला येतो असे आपण म्हणतो, पण वास्तव पाहता आपल्याला रोजच्या कामाच्या धबडग्यातून चार क्षण आनंदाचे, उत्साहाचे, ऐक्याचे मिळवून देण्यासाठी तो येतो. हे परत परत अनुभवता यावे, म्हणून त्याला निरोप द्यायला हवा. त्याचा आदर्श ठेवून मंगलमूर्ती बनण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया. आणि त्याला सांगूया... हा विरह येत्या वर्षभरात संपेल, तू तेवढ्याच आनंदाने भेटीला येशील आणि तुझ्या स्वागतासाठी आम्ही पुन्हा सज्ज असू, याची खात्री आहे, म्हणून तात्पुरता निरोप देतोय...बुद्धिदाता तू आहेसच, फक्त तू दिलेली बुद्धी सत्कारणी लागावी एवढाच आशीर्वाद देऊन जा! 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Visarjanगणेश विसर्जन