शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 19:35 IST

Anant Chaturdashi 2022: बाप्पा येण्याचा आनंद आणि तो जाण्याचे दुःखं शब्दात मांडता येणार नाही, पण निरोप हा दिलाच पाहिजे कारण... 

विरह वाईटच! मग तो व्यक्तीचा असो, नाहीतर बाप्पाचा! दरवर्षी बाप्पाचं असं असं पाठ दाखवून जाणं जिव्हारी लागतं! तो येताना भरपूर आनंद घेऊन येतो आणि जाताना भरपूर आशीर्वाद देऊन जातो, हे मान्य, पण त्याने गेलंच पाहिजे का? खरं तर हो! 'अतिपरिचयात अवज्ञा' असं सुभाषितकारांनी लिहिलंय. आपण काय, बाप्पाला कायमस्वरूपी जवळ ठेवून घेतलं असतं. पण तसं झालं तर प्रत्येक बाबतीत त्याला गृहीत धरलं जाईल. मागण्या मान्य झाल्या तर लाडी गोडी, नाही झाल्या तर रोषाचा धनी ठरवलं जाईल. आपली बकेट लिस्ट न संपणारी आहे. ती पूर्ण करण्यासाठी बाप्पाने आपल्याला सक्षमदेखील केलं आहे. तरी त्याने आपल्याला सोडून जावं असं वाटत नाही. 

निरोप देताना येणारा गहिवर थांबवता येत नाही. जाणारा आपल्या गावी परत जाणार या आनंदात असतो, मात्र निरोप देणारा रिकामं घर, रिकामं मन आणि गत क्षणांमध्ये झुरत राहतो. बाप्पा जाताना आपलीही अवस्था अशीच होते. पण विरहाशिवाय मिलनाचा आनंद तरी कसा अनुभवणार? बाप्पाच्या आगमनासाठी आपण एवढे उत्सुक असतो की बाप्पा जाता जाताच पुढच्या वर्षी किती तारखेला येणार  पाहून ठेवतो. तो येण्याच्या दीड दोन महिने आधीपासून गावचे तिकीट, मूर्तीची नोंदणी, उत्सवाच्या तयारीला उधाण येते. लोक जमतात, गप्पा, गोष्टी, नाच, गाणी, चेष्ठा, मस्करी करत गुण्या गोविंदाने नांदतात. आपापसातील मतभेद  काळासाठी विसरून जातात. एकसुराने एक दिलाने बाप्पाची आरती म्हणतात, गजर करतात, मोदकाचा आस्वाद घेतात. 

बाप्पा आपल्याकडे पाहुणचार घ्यायला येतो असे आपण म्हणतो, पण वास्तव पाहता आपल्याला रोजच्या कामाच्या धबडग्यातून चार क्षण आनंदाचे, उत्साहाचे, ऐक्याचे मिळवून देण्यासाठी तो येतो. हे परत परत अनुभवता यावे, म्हणून त्याला निरोप द्यायला हवा. त्याचा आदर्श ठेवून मंगलमूर्ती बनण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया. आणि त्याला सांगूया... हा विरह येत्या वर्षभरात संपेल, तू तेवढ्याच आनंदाने भेटीला येशील आणि तुझ्या स्वागतासाठी आम्ही पुन्हा सज्ज असू, याची खात्री आहे, म्हणून तात्पुरता निरोप देतोय...बुद्धिदाता तू आहेसच, फक्त तू दिलेली बुद्धी सत्कारणी लागावी एवढाच आशीर्वाद देऊन जा! 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Visarjanगणेश विसर्जन