शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Anant Chaturdashi 2022 : बाप्पाला निरोप देण्याआधी काही क्षण त्याच्याजवळ बसून 'हे'मंत्र अवश्य म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 15:33 IST

Anant Chaturdashi 2022 : बाप्पाला निरोप देणं हे वेदनादायी असतं, म्हणून मनःशांतीसाठी तसेच त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिलेले मंत्र म्हणा!

पाहता पाहता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. दीड दिवसांचे, पाच दिवसांचे गणपती गेले, आता सात दिवसांचे आणि पाठोपाठ दहा दिवसांचे गणपतीही मार्गस्थ होतील. ९ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2022) असून भाद्रपद पौर्णिमेची सुरुवातही पंचांगात दर्शवली आहे. या मुहूर्तावर बाप्पा आपल्या गावी परत जातील. जेवढ्या उत्साहात बाप्पाचे आगमन करतो, तेवढ्याच आदरपूर्वक बाप्पाला निरोप दिला पाहिजे, तरच तोही तृप्त मनाने जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल. 

बाप्पाला निरोप देताना बाप्पाची यथासांग पूजा करा. त्याला प्रिय लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा. बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सान्निध्यात काही काळ शांत बसून 'ओम गण गणपतये नम:' या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर पुढील मंत्र म्हणत बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा. 

- ॐ गणाधिपाय नम:- ॐ उमापुत्राय नम:- ॐ विघ्ननाशनाय नम:- ॐ विनायकाय नम:- ॐ ईशपुत्राय नम:- ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:- ॐ एकदन्ताय नम:- ॐ इभवक्त्राय नम:- ॐ मूषकवाहनाय नम:- ॐ कुमारगुरवे नम:

यानंतर श्री गणेशाची आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी नेल्यानंतर पुन्हा एकदा आरती करा आणि श्री गणेशाच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही, मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घेत मूर्तीचे विसर्जन करा. त्यावेळेस पुढील मंत्र म्हणा...

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Visarjanगणेश विसर्जन