शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:28 IST

आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.

नीता ब्रह्मकुमारी‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा...’, हे गीत प्रसिद्ध आहे. मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली. ही सावली प्रत्येकाची आपली आपली. कधी पुढे तर कधी पाठी. पण नेहमीच साथ देणारी. सूर्याशी जसा आपला संबंध त्यानुसार लहान-मोठी होणारी ही सावली. शाळेत असताना भूगोल शास्त्रात शिकविले जायचे की सूर्यासमोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते. पण जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते. पण या शास्त्राच्या नियमांत अनेक रहस्ये लपलेली आहेत. आपले कर्म सावलीसारखे आपल्यासोबत चालते. सावलीला कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही ती वेगळी होऊ शकत नाही. तसेच कर्मापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्यासोबत धावत राहतात. हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करत नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत चालतात. एखादी घटना घडली की आपण म्हणतो ‘माहीत नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे’. मग ती घटना सुखाची असो वा दु:खाची. आपण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूमागे जितके धावतो तितकेच ते दूर जातात. पण त्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग अनुभवतो. काही गोष्टींमध्ये नशिबाचा भागही असतो. प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे. आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. पण जेव्हा ईश्वराकडे पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तूंना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखविते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटाची समज मिळते म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक