शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:28 IST

आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.

नीता ब्रह्मकुमारी‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा...’, हे गीत प्रसिद्ध आहे. मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली. ही सावली प्रत्येकाची आपली आपली. कधी पुढे तर कधी पाठी. पण नेहमीच साथ देणारी. सूर्याशी जसा आपला संबंध त्यानुसार लहान-मोठी होणारी ही सावली. शाळेत असताना भूगोल शास्त्रात शिकविले जायचे की सूर्यासमोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते. पण जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते. पण या शास्त्राच्या नियमांत अनेक रहस्ये लपलेली आहेत. आपले कर्म सावलीसारखे आपल्यासोबत चालते. सावलीला कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही ती वेगळी होऊ शकत नाही. तसेच कर्मापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्यासोबत धावत राहतात. हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करत नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत चालतात. एखादी घटना घडली की आपण म्हणतो ‘माहीत नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे’. मग ती घटना सुखाची असो वा दु:खाची. आपण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूमागे जितके धावतो तितकेच ते दूर जातात. पण त्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग अनुभवतो. काही गोष्टींमध्ये नशिबाचा भागही असतो. प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे. आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. पण जेव्हा ईश्वराकडे पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तूंना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखविते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटाची समज मिळते म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक