शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:28 IST

आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.

नीता ब्रह्मकुमारी‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा...’, हे गीत प्रसिद्ध आहे. मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली. ही सावली प्रत्येकाची आपली आपली. कधी पुढे तर कधी पाठी. पण नेहमीच साथ देणारी. सूर्याशी जसा आपला संबंध त्यानुसार लहान-मोठी होणारी ही सावली. शाळेत असताना भूगोल शास्त्रात शिकविले जायचे की सूर्यासमोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते. पण जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते. पण या शास्त्राच्या नियमांत अनेक रहस्ये लपलेली आहेत. आपले कर्म सावलीसारखे आपल्यासोबत चालते. सावलीला कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही ती वेगळी होऊ शकत नाही. तसेच कर्मापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्यासोबत धावत राहतात. हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करत नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत चालतात. एखादी घटना घडली की आपण म्हणतो ‘माहीत नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे’. मग ती घटना सुखाची असो वा दु:खाची. आपण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूमागे जितके धावतो तितकेच ते दूर जातात. पण त्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग अनुभवतो. काही गोष्टींमध्ये नशिबाचा भागही असतो. प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे. आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. पण जेव्हा ईश्वराकडे पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तूंना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखविते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटाची समज मिळते म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक