शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आनंद तरंग: विषयाची पारख पारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:24 IST

भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो.

बा. भो. शास्त्रीविषय म्हणजे विषयांचं ज्ञान होय. भोग्य वस्तूचा उचित भोग घेणारा. कोणत्या ऋतूत कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात सेवन करावा, सकाळी कोणता, दुपारी आणि सायंकाळी कोणता खावा, याची ज्याला जाणीव आहे असा. खरं तर निसर्गाने आधीच स्वयंपाक केला आहे. माणसाने त्यात हस्तक्षेप केला. केवळ काकडी खाताना जो आनंद मिळतो, तो मीठ व तिखट लावल्याने मिळत नाही. चव हे जिभेचे चोचले आहेत. देहाची गरज नाही. पशू-पक्षी नैसर्गिक आहार घेतात. ते आहारात ढवळाढवळ करीत नाहीत. हत्ती बलवान, सिंह पराक्रमी, गरुडाची भरारी आणि वानराचं काटक शरीर, कारण ते निसर्गाच्या जवळ आहेत. आंब्याच्या रसात निसर्गाने साखर प्रमाणात टाकलेली असतेच. आम्ही वरून जास्तीची टाकतो. आम्ही खूप पदार्थांत भेसळ केली. मूळ पदार्थांचा स्वभाव बदलला.

विषम स्वभावाचे पदार्थ एकत्र करून खात असतो. त्याचा देहावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण भोग भोगत नसून, रोगच भोगत आहोत. भोगाची यादी वर दिलेलीच आहे. त्यात सर्व आहार सुखं आहेत. यथोचित भोग घेता आला नाही तर भोगातच रोग जन्माला येतात. उचित भोग घेणारे तीन सांगितले आहेत. भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो. जो विषयी आहे, त्याला त्याचा संतुलित आहारच सांभाळत असतो. या भोगाने भोगी तुष्ट होतो. पुष्ट होतो, श्रेय मिळते. आम्ही श्रेय सोडून प्रेयच्या मागे धावतो. प्रेयचा अतिरेक झाला आहे. जेवण अती, मोबाईलचा वापर अती. प्रवास अती, व्यसनं अती, जागरण अती, ते पोषक की घातक याचं ज्ञान नाही. श्रेयस्कर काय आहे, याचा विवेक नाही. रुचलं पाहिजे एवढंच सामान्यांना कळतं. विषयांचा ज्याला अभ्यास आहे, त्यालाच सूत्रात विषया म्हटलेलं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक