शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

 भगवंत आपल्या भक्ताची काळजी कशी घेतो हे सांगणारा स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:55 IST

आपण समोरच्याला त्याच्या पोषाखावरून कमी लेखत असलो तरी भगवंत भक्तांचा सच्चा भाव पाहतो आणि मदतीला धावून येतो, त्याचीच ही कथा!

आपण कोणाला थोडी बहुत मदत करतो आणि स्वत:ला दानशूर समजू लागतो. परंतु, भगवंताशिवाय कोणीही कोणाचा पोशिंदा नसतो. आपण केवळ भगवंताचे दूत असतो. त्याने दिलेले कार्य पूर्ण करणारे माध्यम असतो. परंतु, हे लक्षात न घेता आपण दानाचा वृथा अहंकार बाळगतो. मात्र, भगवंत तो अहंकार फार काळ टिकू न देता आपल्या डोळ्यात अंजन घालतो. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला किस्सा आपल्याला या गोष्टीची निश्चित जाणीव करून देईल.

स्वामीजी एकदा कलकत्त्याला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. संन्यस्त जीवन जगत असलेल्या स्वामीजींकडे प्रवासादरम्यान ना खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या, ना कपडेलत्यांची गाठोडी. एखाद्या फकिराप्रमाणे जीवन व्यतित करणारे स्वामीजी मुखी हरीनाम घेत प्रवास करत होते. 

त्यावेळी एक शेठजी आपल्या पत्नीसह त्याच रेल्वेने प्रवास करत होते. आपल्यासमोर एक फकिर येऊन बसला आहे आणि तो आपल्या बरोबरीने प्रवास करत आहे, ही बाब त्या दोघांना फारशी रुचली नाही. परंतु स्वामीजींकडे प्रवासाचे तिकीट असल्याने ते त्यांना हाकलून देऊ शकत नव्हते. दोघे नाक मुरडून प्रवास करत होते. त्यांच्या डोळ्यात, वागण्या बोलण्यात स्वामीजींप्रती तिरस्काराचे भाव होते. स्वामीजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

प्रवासात भूक लागल्यावर दोघांनी घरून बांधून आणलेली जेवणाची शिदोरी सोडली आणि स्वामींची नजर पडणार नाही अशा बेतात लपवून खायला सुरुवात केली. त्यांना जेवताना अवघडलेपणा वाटू नये, म्हणून स्वामींनी डोळे बंद करून घेतले व ते काली मातेचे नामस्मरण करू लागले. सबंध दिवस प्रवासात जात होता. 

रात्रीचे बारा वाजत आले. गाडी एका स्टेशनावर थांबली. पाय मोकळे करण्यासाठी स्वामीजी दाराजवळ आले. एवढ्या रात्री रेल्वे फलाटावर एक माणूस ट्रेनच्या प्रत्येक डब्यात डोकावून पाहत धावत स्वामींच्या दिशेने येत होता. स्वामींना पाहताच त्याने नमस्कार केला. पाय धरले आणि हातात जेवणाचा डबा दिला. स्वामीजी म्हणाले, 'आपण कोण आहात, मी आपल्याला ओळखत नाही.'

यावर तो मनुष्य म्हणाला, `स्वामीजी, आपण मला ओळखत नाही, परंतु मी आपल्याला बरोबर ओळखले आहे. काल आमच्या घरी देवीचा उत्सव होता. सगळी पूजा अर्चा पार पडल्यावर मी रात्री झोपी गेलो, तर स्वप्नात देवीने मला दृष्टान्त दिला. झोपतोस काय? ऊठ! माझा भक्त तुझ्या गावी येतोय. तो पूजेचा खरा मानकरी आहे. तो उपाशी आहे. त्याला जेवण दिल्याशिवाय तू दिलेला नैवेद्य माझ्यापर्यंत पोहोचणार नाही...मी तत्काळ जागा झालो आणि देवीने केलेल्या वर्णनानुसार शोध घेत इथे आलो आणि तुम्ही मला भेटलात. मी धन्य झालो स्वामीजी...!'

स्वामीजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी मनोमन काली मातेचे आभार मानले. `आई, किती काळजी घेतेस तू लेकरांची..'

स्वामीजींनी त्या व्यक्तीचा भावपूर्ण निरोप घेतला. गाडी सुटली. स्वामीजी जागेवर येऊन बसले. जेवणाचा डबा उघडू लागले. तेव्हा आतापर्यंत घडलेला प्रकार पाहून शेठ आणि शेठाणी वरमले आणि त्यांनी स्वामीजींची माफी मागितली.

हा प्रसंग पाहता समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकातील पंक्ती आठवतात,जगी पाहता देव हा अन्नदाता,तया लागली तत्वता सार चिंता,तयाच मुखी नाम घेता फुकाचे,मना सांग पां रे तुझे काय वेचे।।

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी