शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

Amalaki Ekadashi 2024: गुणकारी आवळा देतो निरोगी दीर्घायुष्य; आमलकी एकादशीनिमित्त जाणून घेऊया महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 11:05 IST

Amalaki Ekadashi 2024: वृक्ष पंचवटीमध्ये आवळ्याच्या वृक्षाचा समावेश आहे, हे झाड केवळ संस्कृती रक्षक नाही तर निसर्ग रक्षकही आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

आज आमलकी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर आवळ्याच्या वृक्षावर येऊन वास करतात, म्हणून आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. तसेच, पूजा झाल्यावर आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत बसून फलाहार केला जातो. निसर्गाच्या जवळ नेणारा आणि अक्षय आनंद देणारा हा दिवस आमलकी एकादशी म्हणून ओळखला जातो. 

आमलकी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात. म्हणून पुजेच्या वेळी  'ओम धात्र्ये नम:' असा मंत्र म्हणावा. आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून प्रार्थना करावी. 

आपल्या आसपासच्या परिसरात परदेशी झाडांची एवढी गर्दी झाली आहे, की देशी झाड शोधूनही सापडत नाही. म्हणून अशा उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या झाडांची लागवड करावी. त्यांचे पालन पोषण करावे. आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज रोवता येईल. त्या वृक्षाचा विस्तार लक्षात घेऊन झाड लावावे आणि त्याचा निगराणीदेखील करावी. यथासांग पूजा झाल्यावर आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी आणि दिवेलागण करून, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. 

देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाझाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले. तेव्हापासून आवळा वृक्षाचे महत्त्व अधिक वाढले. 

आयुर्वेदात आवळ्याला अतिशय महत्त्व आहे. ते एक अमृत फळ आहे. अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. विशेषत: हिवाळ्यात शक्तीवर्धनासाठी आवळ्याचे सरबत, मोरावळा, लोणचे, कँडी खाल्ली जाते. पचनक्रिया उत्तम होण्यासाठी जेवणानंतर रोज आवळा कँडी खावी. प्रवासात मळमळत, गरगरत असेल किंवा तापात तोंडाची चव गेली असेल, तर आवळा सुपारी योग्यप्रकारे काम करते. केसगळतीवर आवळा तेल रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. आवळ्याची आंबट, तुरट चव आणि त्याचा रसरशीतपणा, हिरवा पोपटी रंग सर्वांना आकर्षून घेतो. 

जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मदेव कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्यावेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते.

वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते.  लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आमलकी एकादशीचा हेतू आहे!

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न