शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

Amalaki Ekadashi 2024 :२० मार्च आमलकी एकादशी; आवळ्याच्या झाडाचे पूजन त्या दिवशी का करतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:18 IST

Amalaki Ekadashi 2024 : आपले सण उत्सव हे आपल्याला निसर्गाच्या जवळ नेणारे असून सजगतेने जगायला शिकवतात; आमलकी एकादशी हे त्याचेच रूप; सविस्तर वाचा!

फाल्गुन मास हा वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याचा. चैत्रपालवी आलेली येते, सृष्टी आपले रूप पालटत असते. हा निसर्गसोहळा पाहण्यासाठी या व्रतांचे आयोजन केले आहे. अन्यथा रोजच्या धावपळीतून निसर्गाकडे निरखून बघायला इथे वेळ कोणाला आहे? सूर्य, चंद्र, तारे रोज येतात आणि जातात, फुलं उमलतात कोमजतात, आपण किती वेळ त्यांच्याकडे तल्लीनतेने पाहतो? नाही पाहत ना? म्हणून या व्रत वैकल्यांच्या निमित्ताने निसर्गाच्या अधिक जवळ जावे, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, तजेला घ्यावा आणि नव्या उमेदीने आयुष्यात मार्गक्रमणा करावी, हा मूळ उद्देश असतो. 

आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. फाल्गुन मासात शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते. या तिथीला आवळा एकादशी असेही म्हटले जाते.आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंताचे वास्तव्य असते. या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता, भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्रद्धेने का होईना, लोकांचा निसर्गाशी संबंध यावा, यासाठी सण वारांचे नाते भगवंताशी जोडले आहे. यामुळे देवाचे आणि पर्यायाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. 

वैज्ञानिकदृष्ट्या या तिथीचे महत्त्व लक्षात घेतले, तर रोगनिवारणाची बाब तर्कशुद्ध वाटते. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आवळा सेवनाचे हे फायदे, तर आवळ्याच्या शितल छायेत विसावा घेतला, तर कितीतरी फायदे होतील. 

यासाठी व्रताच्या निमित्ताने आपणही आवळ्याच्या वृक्षाचा शोध घेऊन त्याचे सान्निध्य अनुभवूया आणि आपले रोगनिवारण व्हावे, यासाठी प्रतिदिन आवळासेवन करूया. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली, तरच सुदृढ शरीराने आणि सुदृढ मनाने ईश्वराने सोपवलेल्या कामाची पूर्ती करू शकू आणि ईश्वरकृपादेखील प्राप्त करू शकू.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३