शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2022 : त्रेतायुगाचा प्रारंभ झाला तोही अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, त्यासंदर्भात दोन कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:51 IST

Akshay Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेचे व्रत केल्याने रंकाचा राव कसा झाला, हे सांगणारी कथा, सोबतच त्रेतायुगाच्या दोन पौराणिक कथा वाचा.

वैशाख शुक्ल तृतीयेला 'अक्षय्यतृतीया' असे म्हणतात. हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो. या दिवशी केलेले दान अक्षय्य फल देणारे असते. अशी श्रद्धा पुरातन काळापासून आहे. अक्षय्यतृतीया हा काहींच्या मते कृतयुगाचा प्रारंभ दिन आहे. तर काहींच्या मते तो त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. यासंबंधी असा मतभेद असला तरीही आपण त्रेतायुगाचा प्रारंभ दिन या तिथीला झाला असे मानतो. या संदर्भात अनेक कथा प्राचीन ग्रांथांमधून आढळतात. त्यातील प्रमुख दोन कथा पुढीलप्रमाणे आहेत-

देवधर्म मानणारा आणि धर्माचरणाने वागणारा एक व्यापारी होता. व्यापारातील चढ-उतारात त्याला आर्थिक फटका बसला आणि दारिद्र्य आले. वैशाख शुक्ल तृतीया बुधवारी आली असेल आणि त्यातही रोहिणीनक्षत्रयुक्त असेल तर तो दिवस परमपावन असतो, हे त्याला माहित होते. त्याप्रमाणे योग असलेली अक्षय्यतृतीया आल्यावर या व्रताचे सर्व विधी श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे पुढल्या जन्मी तो कुशावर्ती नगरीचा राजा झाला. त्याने स्वत: आणि त्याच्या प्रजेने अनेक तऱ्हेचे सुखोपभोग भोगले, तरीही त्याचे पुण्य अक्षय्य राहिले.

दुसरी कथा अशी-

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला त्यावेळी यज्ञसमाप्तीच्या वेळी एक मुंगूस यज्ञमंडपात आले. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा होता. यज्ञमंडपातील वेदीवर ते मुंगूस लोळू लागले. आपले उरलेले अर्धे अंग यज्ञाच्या पवित्र स्थळामुळे सोन्याचे होईल असा त्याचा समज होता. पण तसे झाले नाही. धर्मराजाने `तू असे का लोळतो आहेस?' याची चौकशी केली, तेव्हा मुंगूस म्हणाले, `धर्मराजा, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी दान केलेल्या गव्हाच्या दाण्याइतकेही पुण्य हा यज्ञ केल्याने तुला लाभलेले नाही. माझे अर्धे शरीर जे सोन्याचे झाले, ते एका सत्यवादी ब्राह्मणाने केलेल्या पुण्यामुळे झाले.' 

धर्मराजाने कुतूहलाने त्याला 'ब्राह्मणाने कोणते पुण्य केले?' असे विचारल्यावर मुंगूस म्हणाले, `तो ब्राह्मण व्यवसाय उद्योग करून जेमतेम आपला चरितार्थ चालवत असे. एका अक्षय्यतृतीयेच्या दिवशी माध्यान्ही तो जेवायला बसणार इतक्यात प्रत्यक्ष भगवंत ब्राह्मणरूपाने त्याच्याकडे येऊन माधुकरी मागू लागला. घरात जे अन्न शिजवले होते ते सर्व अन्न त्या ब्राह्मणाने अतिथीरूपी भगवंताला मोठ्या प्रेमाने दिले. परिणामी त्या ब्राह्मणासह त्याच्या घरातील सगळेजण उपाशी राहिले. अतिथीरूपी देवाने जे अन्न भक्षण केले त्याची थोडीशी शिते, थोडासा अंश जमिनीवर सांडला होता, तो मी खाल्ला. त्यामुळे माझे शरीर अर्धे सोन्याचे झाले. दुसरा अर्धा भागही सोन्याचा व्हावा म्हणून मी इथे आलो, या यज्ञवेदीवर लोळण घेतली. पण माझ्या शरीराचा एक केसही सोन्याचा झाला नाही. म्हणून म्हणतो, या केलेल्या यज्ञापासून तुला थोडेदेखील पुण्य प्राप्त झालेले नाही.' अक्षय्यतृतीयेच्या व्रताचा महिमा असा अलौकिक आहे. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीया