शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

धागा धागा अखंड विणूया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:57 AM

मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात.

- इंद्रजित देशमुखमानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात. त्याप्रमाणे मानव्याच्या जोपासनेसाठी एकत्र येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने आपापला वैयक्तिक अभिनिवेशटाकून सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे तरच मानव्याची जोपासना होऊ शकते. याच माणसाला माणूस जोडण्याच्या प्रक्रियेला अनुबोधून कविवर्य पी. सावळाराम म्हणतात,‘धागा धागा अखंड विणूया।विठ्ठल विठ्ठ मुखे म्हणूया।।’मुळात सगळ्यांच्यात आपलेपणा पाहून त्या आपलेपणास अनुसरून असलेलं आंतरिक स्नेह आपल्याकडून सहज व्यक्तव्हायला लागलं की समाजात एकात्मता नांदू लागते. आपल्या भोवतालच्या निसर्गातील विविधरंगी वसुंधरेच्या अंगावरील हे जे अक्षांशाचे आणि रेखांशाचे उभे आणि आडवे विणलेले आवरण आहे. ते विणताना त्या निर्मात्याने सगळ्या प्रभावी आणि अभावी गुणधर्माच्या घटकांना एका संगतीत आणले आहे. आम्ही आमच्या जगण्यात आपले हात आणि पाय यांच्या सकारात्मक कृतीने सगळ्यांची मनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या एकत्र येण्याने समाजात जे अर्धवट सुरक्षित आहे त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, आपल्यातील कुणी मागे असल्याचं शल्य मनात धरून त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची ताकद आणि उत्तेजना दिली पाहिजे. सुखाची आणि आनंदाची अनुभूती सहजीवी स्वरूपात सगळ्यांनी एकत्र मिळून घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला बंधुत्वाचा चरखा फिरवून एकत्वाचे सूत्र विणण्याचा प्रयत्न करून आपण एक बनूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक