शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:43 IST

Adhik Maas 2023: देवाला अंघोळ घालून मगच पुढची पूजा पूर्ण केली जाते, अशा वेळी देवस्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे पावित्र्य कसे जपावे ते जाणून घ्या. 

आपण सगळे रोजच देवाची पूजा करतो. शास्त्रसंगीत पूजा करण्याइतका जरी वेळ नसला, तरी देवाला स्नान, गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप एवढा सोपस्कार आपण पार पाडतो. काही जण देवाला नुसती निर्माल्याची फुलं काढून ताजी फुलं वापरली जातात. पण विचार करा, एक दिवस आपण अंघोळ न करता नुसता परफ्युम मारून बाहेर गेलो तर? अंघोळ न केल्याची जाणीव दिवसभर मनात राहील. कपड्यांना सुगंध येईल, पण शरीराचे काय? त्याचीही स्वच्छता हवीच! मग जे आपल्याला आवडते, ते देवालाही आवडत असणारच ना! त्याच भावनेतून देवाला रोज स्नान घालून पूजा अर्चा केली जाते. 

या देवस्नानाबाबतीतही अनेकांना प्रश्न पडतो, की देवपूजा करण्यासाठी पाणी कोणतं घ्यावं? किंवा अधिक मास तसेच विशिष्ट सण वारी पूजा करताना झाकणबंद घड्यातलं गंगा जल वापरावं का? ते किती जुने असले तर चालते? त्याचा वापर कधी करावा? इ. शंकांचे निरसन करत आहेत आळंदीचे समीर तुर्की. 

पूजा करताना पाणी कोणते वापरावे असे विचार असाल, तर अगदी मूळ नियमांप्रमाणे सोवळ्यात पाणी भरून आणून मग पूजा - अभिषेक करायला हवा. अगदीच नियमांवर बोट ठेवायचं म्हटलं तर नळाचे पाणी सुद्धा पूजेसाठी चालणार नाही असं आहे. पण दैनंदिन आयुष्यात आपल्याला ते शक्य नाही. 

दुर्दैवाने शुद्ध जलस्रोत आता जवळजवळ नष्ट भ्रष्ट झाल्यात जमा आहेत. ओढ्यानालयांची गटारे झाली आहेत. नद्यांच्या प्रदूषणाने सर्व रेकॉर्ड्स मोडून काढली आहेत. कित्येक ठिकाणी अगदी विहिरींना सुद्धा केमिकल्सच पाणी येऊ लागलं आहे.. एकूणच आपण हतबल आहोत. त्यामुळे कालानुरूप बदल अपरिहार्य आहे. 

अशा वेळी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी जे "सर्वात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी" असेल ते कलश किंवा पूजेच्या गडूमध्ये  भरून घ्यावं. त्याआधी आपण शुचिर्भूत अर्थात स्नान करून स्वच्छ व्हावं. त्यानंतर इथे तिथे होणारे स्पर्श टाळून आधी पूजा करून घ्यावी. स्वच्छ पाण्याने देवांना अभिषेक करावा. घंटा वाजवावी. दिवा लावून उदबत्ती लावावी. हळद, कुंकू, अष्टगंध उगाळून लावावे. 

'हे' पाणी वापरू नये!

अशुद्ध, कसलासा वास येणारं, रंगीबेरंगी, तवंग येणारं पाणी चुकूनही देवपूजा करण्यासाठी घेऊ नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी मात्र नियम पाळण्याचा यत्न अवश्य करावा. सागरजल तथा गंगाजल सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर क्रमशः सप्तनद्या, महानद्या, नद्या, तीर्थक्षेत्रांमधून आणलेलं पाणी, पुष्करीणी, कुंड, तलाव, ओढा, झरा, विहिरी आणि कूपनलिका असा क्रम जलाच्या पावित्र्याबाबत समजला जातो. ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ पावसाचे पाणी भरून ठेवून वापरावे. थोडं विचित्र वाटेल कदाचित पण पावसाच्या पाण्यात अनेक चमत्कारिक गुणधर्म असतात. बागकाम करणाऱ्या कोणालाही ह्याचा अनुभव असेलच. त्यामुळे देवपूजेसाठीही तेच पाणी चांगले म्हणता येईल. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना