शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 07:00 IST

Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना!

जन्म यातनेतून होतो, त्यामुळे मृत्यू अर्थात शेवट तरी गोड व्हावा, अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. समाज माध्यमावर एका वृद्ध गृहस्थांचा हा फोटो वाचला आणि खाली कॅप्शन होती, श्रीमद् भागवत पुराण वाचत असताना, श्रीविष्णू चरणी प्राणार्पण! त्या गृहस्थांच्या नशिबाचा हेवा वाटला. मरण कोणालाच सांगून येत नाही, पण आलेच तर असे सुखासुखी यावे. हेच तुकोबांनी देखील मागितले होते, 

याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥

आपण जन्माला येताना रडतो, पण आई आनंदाश्रू ढाळते, तसेच आपण मरताना आनंदात जावे आणि आपल्या पाठीमागे चार लोकांनी रडावे असे वाटत असेल तर आयुष्यभर सत्कर्म करावे लागते. जीवन आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखकर बनवला तरच शेवटही गोड होतो. हे ज्यांना कळले त्यांना जीवन कळले असे म्हणता येईल. मात्र आपण भेदभाव, द्वेष, वैर, लोभ, हव्यास या विकारांमध्ये एवढे गुंतून जातो की हा प्रवास कुठे न्यायचाय आणि कधी थांबवायचाय हेच लक्षात येत नाही. 

म्हणून आपल्या आयुष्याचे ध्येय हे सत्कर्म करणे हेच असायला हवे. आपल्या कडून कोणाही जीवाचा मत्सर घडू नये यासाठी दक्ष असावे. प्रामाणिकपणे आपले जीवन जगावे. त्या कामाची पावती खुद्द भगवंत देतो. आणि विनासायास मरण देतो. यासाठी कर्तव्याप्रती जागृत होऊन या अधिक मासात आणि कायमस्वरूपी रोज झोपताना एक श्लोक म्हणूया , 

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् । देहान्ते तव सायुज्यं देहि मे परमेश्वरम् ॥

नमो भगवते वासुदेवाय!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना