शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:17 IST

Adhik Maas 2023: 'जाशील बुधी तर येशील कधी' हा वाक्प्रचार पूर्वीच्या बायकांच्या तोंडी असायचा; त्याचा अर्थ काय आणि अधिक मासाशी संबंध काय? वाचा. 

लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जाते. लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण, प्रेम, ओढ तसूभरही कमी होत नाही. माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही. अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो. जशी तगमग तिची होते, तशीच घरच्यांचीदेखील होते. म्हणून पूर्वी पाठवणी करताना एक नियम पाळला जात असे, तो म्हणजे लेकीला बुधवारी सासरी न पाठवण्याचा!

अधिक मासात लेक आणि जावई वाण घेण्यासाठी माहेरी येतात, अशा वेळी त्यांना त्यांच्या घरी अर्थात सासरी परत पाठवणी करताना शक्यतो बुधवारी पाठवू नका, आग्रहानं आणखी एखाद दिवस थांबवा आणि मगच पाठवा. यामागे धार्मिक कारण तर आहेच पण भावनिक कारण जास्त तर्कसुसंगत आहे. 

बुध प्रदोष व्रतात सापडते कारण...

बुध प्रदोष व्रत कथेनुसार एक पुरुष आपल्या नव्या नवरीला नेण्यासाठी सासरी गेला. जुन्या काळातला विवाह असल्याने पत्नीने आपल्या पतीला नीटसे पाहिलेही नव्हते. ते दोघे घरी जायला निघाले तो बुधवार होता. प्रवासात तिला तहान लागल्याने तिने खाली मानेनेच पतीला पाणी आणायला सांगितले. बैलगाडीचा प्रवास थांबवत पती पाणी शोधायला गेला. थोड्यावेळाने पाणी घेऊन आला आणि पाहतो तर आपली बायको परपुरुषाशी बोलत त्याने दिलेले पाणी पित आहे. त्याला खूप राग आला. तो तावातावाने गेला. बायकोशी भांडू लागला. आधी पाणी घेऊन आलेला हाच आपला नवरा आहे असे वाटून तिने पाणीही प्यायल्याने सांगितले आणि आपल्या चुकीची कबुली दिली. तरी नवऱ्याचा राग जाईना. अशा वेळी तिने महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवाच्या कृपेने तो परपुरुष न बोलता तिथून निघून गेला आणि नवं दाम्पत्याचे भांडण मिटले. महादेवामुळे त्यांचा काडीमोड होता होता वाचला म्हणून त्यांनी बुध प्रदोष व्रत सुरु केले आणि बुधवारी सासरी निघायचे नाही असा संकल्प केला. 

व्रताचे सार : आताच्या काळात या कथांचे वाचन करताना आपल्याला भाबडेपणा जाणवत असला तरी येनकेन प्रकारेण देवभक्ती रुजवण्याचा, नाती सांभाळण्याचा आणि प्रामाणिक राहून नैतिकता जपण्याचा संस्कार या कथांमधून केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणही भोळा भाव लक्षात घेऊन श्रद्धेने काही गोष्टींचे आजही पालन करतो. 

पूर्वीची म्हण : 'जाशील बुधी, तर येशील कधी?' बुध प्रदोषाच्या व्रतकथेवरुन ही म्हण आली असावी. पूर्वी आई-आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर पुढचा बराच काळ सासरी परत येणार नाहीस अशी काळजी व्यक्त केली जात असे. या मायेपोटी लेकींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी. 

सद्यस्थिती : पूर्वी माहेर-सासर दूर दूर असल्याने लेकीच्या येण्याकडे घरच्यांचे डोळे लागलेले असायचे. मात्र सद्यस्थितीत अनेक जणींचे माहेर अगदी हाकेच्या अंतरावर असते. फार फार तर एका दिवसात जाऊन परत येण्यासारखे असते. तसेच सासरच्या अटी शिथिल झाल्यामुळे वरचेवर माहेरी जाणे होते. त्यामुळे पूर्वीसारखे माहेरी जाण्यासाठी ताटकळत बसावे लागत नाही. काही गोष्टी कालांतराने मागे पडल्या असल्या, तरी माया-मोह आणि माहेरची ओढ कधीच कमी होत नाही. म्हणून आजही अनेक घरातून माहेर वाशिणींना बुधवारी सासरी पाठवणे टाळले जाते. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना