शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:17 IST

Adhik Maas 2023: 'जाशील बुधी तर येशील कधी' हा वाक्प्रचार पूर्वीच्या बायकांच्या तोंडी असायचा; त्याचा अर्थ काय आणि अधिक मासाशी संबंध काय? वाचा. 

लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जाते. लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण, प्रेम, ओढ तसूभरही कमी होत नाही. माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही. अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो. जशी तगमग तिची होते, तशीच घरच्यांचीदेखील होते. म्हणून पूर्वी पाठवणी करताना एक नियम पाळला जात असे, तो म्हणजे लेकीला बुधवारी सासरी न पाठवण्याचा!

अधिक मासात लेक आणि जावई वाण घेण्यासाठी माहेरी येतात, अशा वेळी त्यांना त्यांच्या घरी अर्थात सासरी परत पाठवणी करताना शक्यतो बुधवारी पाठवू नका, आग्रहानं आणखी एखाद दिवस थांबवा आणि मगच पाठवा. यामागे धार्मिक कारण तर आहेच पण भावनिक कारण जास्त तर्कसुसंगत आहे. 

बुध प्रदोष व्रतात सापडते कारण...

बुध प्रदोष व्रत कथेनुसार एक पुरुष आपल्या नव्या नवरीला नेण्यासाठी सासरी गेला. जुन्या काळातला विवाह असल्याने पत्नीने आपल्या पतीला नीटसे पाहिलेही नव्हते. ते दोघे घरी जायला निघाले तो बुधवार होता. प्रवासात तिला तहान लागल्याने तिने खाली मानेनेच पतीला पाणी आणायला सांगितले. बैलगाडीचा प्रवास थांबवत पती पाणी शोधायला गेला. थोड्यावेळाने पाणी घेऊन आला आणि पाहतो तर आपली बायको परपुरुषाशी बोलत त्याने दिलेले पाणी पित आहे. त्याला खूप राग आला. तो तावातावाने गेला. बायकोशी भांडू लागला. आधी पाणी घेऊन आलेला हाच आपला नवरा आहे असे वाटून तिने पाणीही प्यायल्याने सांगितले आणि आपल्या चुकीची कबुली दिली. तरी नवऱ्याचा राग जाईना. अशा वेळी तिने महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवाच्या कृपेने तो परपुरुष न बोलता तिथून निघून गेला आणि नवं दाम्पत्याचे भांडण मिटले. महादेवामुळे त्यांचा काडीमोड होता होता वाचला म्हणून त्यांनी बुध प्रदोष व्रत सुरु केले आणि बुधवारी सासरी निघायचे नाही असा संकल्प केला. 

व्रताचे सार : आताच्या काळात या कथांचे वाचन करताना आपल्याला भाबडेपणा जाणवत असला तरी येनकेन प्रकारेण देवभक्ती रुजवण्याचा, नाती सांभाळण्याचा आणि प्रामाणिक राहून नैतिकता जपण्याचा संस्कार या कथांमधून केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणही भोळा भाव लक्षात घेऊन श्रद्धेने काही गोष्टींचे आजही पालन करतो. 

पूर्वीची म्हण : 'जाशील बुधी, तर येशील कधी?' बुध प्रदोषाच्या व्रतकथेवरुन ही म्हण आली असावी. पूर्वी आई-आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर पुढचा बराच काळ सासरी परत येणार नाहीस अशी काळजी व्यक्त केली जात असे. या मायेपोटी लेकींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी. 

सद्यस्थिती : पूर्वी माहेर-सासर दूर दूर असल्याने लेकीच्या येण्याकडे घरच्यांचे डोळे लागलेले असायचे. मात्र सद्यस्थितीत अनेक जणींचे माहेर अगदी हाकेच्या अंतरावर असते. फार फार तर एका दिवसात जाऊन परत येण्यासारखे असते. तसेच सासरच्या अटी शिथिल झाल्यामुळे वरचेवर माहेरी जाणे होते. त्यामुळे पूर्वीसारखे माहेरी जाण्यासाठी ताटकळत बसावे लागत नाही. काही गोष्टी कालांतराने मागे पडल्या असल्या, तरी माया-मोह आणि माहेरची ओढ कधीच कमी होत नाही. म्हणून आजही अनेक घरातून माहेर वाशिणींना बुधवारी सासरी पाठवणे टाळले जाते. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना