शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

समाधानी आयुष्य मिळवण्यासाठी 'या' सहा गोष्टींचा आयुष्यात जरूर समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:00 IST

या गोष्टी समजून उमजून आयुष्यात आणल्या, तर आयुष्याचे गणित कधीच चुकणार नाही!

वयाच्या तीस वर्षाआधी असे करा, चाळीशी आधी तसे करा, वगैरे सांगणाऱ्या अनेक पोस्ट समाज माध्यमांवर आपण वाचत असतो. त्या यादीतल्या किती गोष्टी पूर्ण केल्या आणि किती राहून गेल्या याची बेरीज वजाबाकी करताना अपूर्ण राहिलेल्या गोष्टींबद्दल मनाला हुरहूर लागून राहते. तसे उर्वरित आयुष्यातही घडू नये, म्हणून प्राधान्य क्रम ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीची एक क्रमवारी ठरलेली असते. त्यात फेरबदल झाले तर गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून काही नियम हे पाळावेच लागतात.  

हे केवळ व्यवहार ज्ञान नसून हे पारमार्थिक ज्ञानदेखील आहे. आपल्याला भगवंत हवा, तर आधी त्याचा ध्यास धरा. त्याला मिळवण्यासाठी त्याच्या आवडीचे काम करा, मग तो मिळेल अशी अपेक्षा ठेवा. परंतु काही न करता त्याची कृपादृष्टी प्राप्त होईल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अभ्यास न करता परीक्षेत उत्तीर्ण होण्यासारखे आहे. यासाठीच इथेही गरजेचा असतो, प्राधान्यक्रम!

म्हणून आयुष्यात सहा गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून टाका...

  • प्रार्थनेआधी विश्वास ठेवा. 
  • बोलण्याआधी ऐकून घ्या. 
  • खर्च करण्याआधी कमवा. 
  • लिहिण्याआधी विचार करा. 
  • पराभवाआधी प्रयत्न करा. 
  • आणि मरण्याआधी जगा. 

या गोष्टी समजून उमजून आयुष्यात आणल्या, तर आयुष्याचे गणित कधीच चुकणार नाही!