शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वास्तुशास्त्रानुसार मातीच्या 'या' वस्तू, भांडी घरात ठेवणे ठरते लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:54 IST

मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे.

आपला उगम मातीतला आणि शेवटही मातीतच! निसर्गाशी समरसता दाखवणारे आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवणारे माध्यम म्हणजे माती. मातीचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात. म्हणून बालपणी मुलांनी जास्तीत जास्त मातीत खेळले पाहिजे असे वैद्यकीय तज्ञ देखील सांगतात. बैठ्या खेळांपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य देतात. हे भाग्य दुर्दैवाने मोबाईल पिढीकडून आपणच हिरावून घेतले आहे. अशा मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे. तसे करणे वास्तूच्या दृष्टीनेही लाभदायक आहे. 

१. फ्रिजचे पाणी न पिता माठाचे पाणी पिण्याचा सराव करा. पाणी मचूळ येत असेल तर ते फिल्टर करून माठात भरा आणि नैसर्गिक थंड पाण्याची गोडी मुलांना लावा. मात्र दरदिवशी माठ स्वच्छ विसळून भरा अन्यथा त्यात सूक्ष्म किडे होण्याचा धोका असतो. त्यासाठी पाणी वस्त्रगाळ करून भरणे केव्हाही योग्य!

२. बाजारात अनेक प्रकारची आधुनिक पद्धतीची मातीची भांडी विकत मिळतात. मातीचा तवा, हंडी, पातेले, वाट्या, ताटे यांचा वापर करता आले तर उत्तम. कुल्लड मधून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. तसेच घट्ट कवडीदार दही हवे असेल तर  मातीचे भांडे केव्हाही सरस ठरते!

३. ज्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो, त्याघरात भरभराट होते असे वास्तू शास्त्र सांगते. त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते. 

४. बागेसाठी देखील प्लॅस्टिक किंवा इतर कुंड्यांचा वापर न करता जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर लाभदायक ठरतो. वास्तू शास्त्रानुसार मातीच्या कुंड्यांमध्ये लावलेली रोपं मूळ घट्ट धरतात. आणि वेगाने फोफावतात. 

५. घरात कोणी सतत तणावग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला मातीच्या कुंडीत लावलेल्या रोपाला दररोज पाणी घालायला सांगा. हा उपाय अनेकांना परिणामकारक ठरतो. 

६. पक्ष्यांना खाऊ घालण्याची तुम्हाला सवय असेल तर त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून मातीचे पसरट भांडे जरूर ठेवा. पक्ष्यांनाही थंड पाणी मिळेल. 

७. देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल, तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल. 

८. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला मातीचा दिवा प्रज्वलीत करावा. लाभ होतो. 

९. लहान मुलांना संचयनी गोळा करण्यासाठी मातीचे खेळणे द्या, तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केल्यास धनवृद्धी होते. 

१०. दाम्पत्य जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर किंवा रोज सायंकाळी तुळशीजवळ मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र