शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शास्त्रानुसार पूर्ण विवस्त्र स्थितीत अंघोळ करू नये ; पण का? भागवत पुराणात सापडते कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:40 IST

पूर्वीचे लोक शास्त्रसंकेत पाळायचे, अगदी अंघोळ करतानाही एखादे वस्त्र अंगावर ठेवून अंघोळ करायचे; त्यामागे कारण काय ते जाणून घ्या!

आजही आपण आई आजीने सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन करतो. काही गोष्टी तर्क सुसंगत असतात तर काही गोष्टी केवळ त्यांची श्रद्धा म्हणून आपणही करतो. मात्र नीट विचार केला तर त्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण दडलेले असे. पूर्ण विवस्त्र स्थितीत अंघोळ करू नये या शास्त्र संकेतांमागेही कारण दडले आहे, त्या आधी पौराणिक संदर्भ जाणून घेऊ. 

ज्योतिष अभ्यासक देवदत्त जोशी लिहितात, 'श्रीमद भागवत पुराणात दहाव्या स्कंधात, बाविसाव्या अध्यायात कथा आहे, की कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केले. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणतात-

यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता, व्यगाहतैतत तदु देवहेलनमबद्धवांजली मुर्धन्यपनुत्तयेsहस: कृत्त्वा नमोsधो वसनं प्रगृह्यताम !!

अर्थ : मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत, त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या. 

तात्पर्य हे की विवस्त्र अंघोळ केल्याने जलदेवता व वरुण देवतेची अवहेलना होते. अनादर, अपमान होतो म्हणून विवस्त्र स्नान करू नये. 

यामागील तर्क काय असू शकते? 

तर पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धत होती. न्हाणीघर स्वतंत्र असले तरी चुकभुलीने दाराची कडी नीट लागली नाही आणि पटकन कोणी प्रवेश केला तर निदान लज्जा रक्षणापुरते अंगावर कपडे असले तर त्या स्थितीत दोघांना अवघडणार नाही. म्हणून पंचा नेसून अंघोळ करण्याची पूर्वी प्रथा होती. कापड ओले करणे असे त्या पद्धतीला म्हणत असत. 

सद्यस्थितीत विभक्त कुटुंब असल्याने तशी भीती राहिलेली नाही. तरीसुद्धा कोणता प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. यासाठी पूर्वकाळजी म्हणून निदान कमरेचे अंतर्वस्त्र  घालून अंघोळ करावी आणि अंघोळ झाल्यावर पंचा, टॉवेल गुंडाळून ओले कपडे बदलावेत असे ज्येष्ठ मंडळी सांगतात.