शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
4
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
5
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
6
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
7
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
8
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
9
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
10
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
11
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
12
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
13
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
14
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
15
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
16
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
17
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
18
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
19
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
20
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

पंचांगातील माहितीनुसार कलियुग आणखी किती वर्षे शिल्लक आहे? पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 12:38 PM

आता आपण कलियुगात जगत आहोत आणि ते संपायला अजून पुष्कळ अवकाश आहे. तूर्तास आपण आजवर लक्ष केंद्रित करूया आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवूया. 

दर ठराविक दिवसांनी किंवा महिन्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून जगबुडीची हूल उठवली जाते आणि त्यावर चर्चा रंगतात. आपल्या जन्मापासून आपणही निदान दहा-बारा वेळा तरी जगबुडीच्या वार्ता ऐकल्या असतील. परंतु, खरोखरच असे काही होणार आहे का? असेल तर कधी ? याबाबत एके ठिकाणी माहिती मिळाली. पंचांगातील माहितीच्या आधारे ती विश्वसनीयदेखील वाटू लागली. त्यात काय म्हटले आहे ते पाहू-

सृष्टीला चार युगात वाटले आहे. १. सतयुग २. त्रेतायुग ३. द्वापर युग ४. कलियुग

या चार युगाचे आयुर्मान खालीलप्रमाणे दिले आहे.सतयुग : १७,२८,०००त्रेता युग : १२,९६,०००द्वापर युग : ८,६४,०००कलियुग : ४,३२,०००

आता आपण कलियुगात जगत आहोत आणि ते संपायला अजून पुष्कळ अवकाश आहे. नवीन वर्षाच्या दाते पंचांगात तसे स्पष्ट नमूद केले आहे, की कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२२ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार, ८७८ वर्षे शिल्लक आहेत. एवढ्या कालावधीत आपण ८४ लक्ष योनी फिरून जन्म मृत्यूचे चक्र पार करतो. त्याचाही हिशोब दिला आहे.

एकूण जन्म : ८४ लक्षफुल झाडे वनस्पती : ३० लक्षकिटक : २७ लक्षपक्षी : १४ लक्ष पाण्यातील जीव जंतू : ९ लक्षपशू : ४ लक्ष

या क्रमाने जन्म मृत्यू चालतो आणि या चक्राबरोबर युगाची परिक्रमा सुरू राहते आणि तिचा कालावधी पूर्ण झाला की युग संपते. त्यामुळे जगबुडीची वाट बघू नका. ती व्हायची तेव्हा होईलच. तूर्तास आपण आजवर लक्ष केंद्रित करूया आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवूया.