शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पंचांगातील माहितीनुसार कलियुग आणखी किती वर्षे शिल्लक आहे? पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 12:38 IST

आता आपण कलियुगात जगत आहोत आणि ते संपायला अजून पुष्कळ अवकाश आहे. तूर्तास आपण आजवर लक्ष केंद्रित करूया आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवूया. 

दर ठराविक दिवसांनी किंवा महिन्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून जगबुडीची हूल उठवली जाते आणि त्यावर चर्चा रंगतात. आपल्या जन्मापासून आपणही निदान दहा-बारा वेळा तरी जगबुडीच्या वार्ता ऐकल्या असतील. परंतु, खरोखरच असे काही होणार आहे का? असेल तर कधी ? याबाबत एके ठिकाणी माहिती मिळाली. पंचांगातील माहितीच्या आधारे ती विश्वसनीयदेखील वाटू लागली. त्यात काय म्हटले आहे ते पाहू-

सृष्टीला चार युगात वाटले आहे. १. सतयुग २. त्रेतायुग ३. द्वापर युग ४. कलियुग

या चार युगाचे आयुर्मान खालीलप्रमाणे दिले आहे.सतयुग : १७,२८,०००त्रेता युग : १२,९६,०००द्वापर युग : ८,६४,०००कलियुग : ४,३२,०००

आता आपण कलियुगात जगत आहोत आणि ते संपायला अजून पुष्कळ अवकाश आहे. नवीन वर्षाच्या दाते पंचांगात तसे स्पष्ट नमूद केले आहे, की कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२२ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार, ८७८ वर्षे शिल्लक आहेत. एवढ्या कालावधीत आपण ८४ लक्ष योनी फिरून जन्म मृत्यूचे चक्र पार करतो. त्याचाही हिशोब दिला आहे.

एकूण जन्म : ८४ लक्षफुल झाडे वनस्पती : ३० लक्षकिटक : २७ लक्षपक्षी : १४ लक्ष पाण्यातील जीव जंतू : ९ लक्षपशू : ४ लक्ष

या क्रमाने जन्म मृत्यू चालतो आणि या चक्राबरोबर युगाची परिक्रमा सुरू राहते आणि तिचा कालावधी पूर्ण झाला की युग संपते. त्यामुळे जगबुडीची वाट बघू नका. ती व्हायची तेव्हा होईलच. तूर्तास आपण आजवर लक्ष केंद्रित करूया आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवूया.