शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

गरुडपुराणानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे का महत्त्वाचे असते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:28 IST

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे अनिवार्य मानले जाते. पिंडदान विधी केल्याने आत्म्याला सद्गती मिळते, असे गरुड पुराण सांगते. 

जिवंतपणी व्यक्ती विषय वासनेत अडकलेली असते. ज्ञानाच्या परमार्थाच्या गोष्टी आत्मसात करत नाही आणि अचानक मृत्यू आला की सर्व काही जागच्या जागी सोडून परलोकी निघून जाते. अशा वेळी आत्म्याच्या उद्धारासाठी व त्याला योग्य दिशेने गती मिळावी यासाठी गरुड पुराणाने पिंडदान महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे. 

असे मानले जाते की मृत्यूच्या तेराव्या दिवशी, पिंडातून आत्मा ब्रह्माण्डात जातो. हा सूक्ष्म आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी त्याला योग्य दिशा दर्शवणे गरजेचे असते. या तेरा दिवसात व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा हिशोब केला जाऊन त्याला त्याच्या कर्मानुसार गती मिळते. श्राद्ध विधी त्याकरिताच सांगितलेल्या आहेत. या विधीनुसार आत्म्याला सर्व विकारातून, विषयातून मुक्त करून अखिल विश्वशक्तीत सामावण्याचा मार्ग दर्शवला जातो. 

मृत्यूपश्चात तेरा दिवस आत्मा घुटमळत असतोगरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा १३ दिवस त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ, विषयांजवळ घुटमळत राहतो. या काळात त्याला राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा देहात प्रवेश करायचा असतो. परंतु एका जन्मात अनंत यातना भोगल्यानंतर पुन्हा जन्मच नको, तर मोक्ष मिळावा, यासाठी आत्म्याला विषय वासनेपासून मुक्त केले जाते. जिवंत पणी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आत्म्याला मोहपाशापासून दूर करण्यासाठी श्राद्धविधी केला जातो. 

पिंड दान देऊन आत्म्याला अन्न मिळतेदरम्यान, नातेवाईक १० दिवस आत्म्यासाठी पिंड दान करतात. ज्याद्वारे त्याचे सूक्ष्म शरीर तयार होते. पहिल्या दिवसापासून आत्मपिंड, दुसर्‍या दिवसापासून मान आणि खांदा, तिसऱ्या दिवसापासून हृदय, चौथ्या दिवसापासून पाठ, पाचव्या दिवसापासून नाभी, सहाव्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत कंबर व खालचा भाग, भूक आणि तहान इ. जाणीव नवव्या आणि दहाव्या दिवसापर्यंत तयार होतात . असा सूक्ष्म देह धारी आत्मा परलोकीच्या प्रवासाला निघतो. या सर्व गोष्टींसाठी श्राद्ध विधी महत्त्वाचा मानला जातो.