शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सूर्योदयापूर्वीचे जेवण हे धुंधुरमासाचे वैशिष्ट्य, हा सोहळा फक्त १५ जानेवारीपर्यंतच; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 07:00 IST

१५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा काळ धुंधुरमास म्हटला जातो, तो साजरा कसा करतात ते जाणून घ्या!

मनुष्य स्वभाव असा आहे, की तो कोणत्याही ऋतूत कुरकुरतच असतो. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो नाहीतर हिवाळा! तरीदेखील आवडता ऋतू कोणता, असे विचारल्यावर हिवाळ्याला बहुतांशी पसंती मिळते. कारण, या ऋतूमध्ये वर्षभरात साठलेल्या सुट्या, राहून गेलेल्या सहली आणि नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्साह असे बरेच काही दाटून आले असते. म्हणून इतर दोन ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्याचा उत्साह वेगळाच असतो. अनेकदा अलार्मपूर्वी जाग येते आणि धुक्याची पांघरलेली पहाट अनुभवण्याचा योग जुळून येतो. हे झुंजूमुंजू वातावरणच वैशिष्ट्य आहे धुंधुरमासाचे!

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. तर काही लोक झुंझुरमास असेही म्हणतात.या दिवसात भल्या पहाटे उठून मोसमी भाज्या, फळे खाल्ली जातात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो.

हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषत: रात्री गारठा जास्त जाणवतो. दिवस लहान व रात्र मोठी असते. शरीर थंड व जठराग्नि प्रज्वलित होतो. अर्थात भूक जास्त लागते. परंतु, त्याचवेळेस पचनक्रिया मंदावलेली असते, म्हणून पौष्टिक आहारावर भर दिला जातो. 

बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते, प्रबलोऽनल:भवति।

याचा परिणाम असा होतो, की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे-

दैघ्र्यात् निशानाम् एतर्ही, प्रात: एव बुभुक्षित: (भवति)।

आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो-अल्पेन्धनो धातून् स पचेत् 

अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.

हे सर्व टाळायचे अस, तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे.म्हणून धनुर्मासात प्रात: एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.

इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला अन्नपदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.

धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीfoodअन्न