शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सूर्योदयापूर्वीचे जेवण हे धुंधुरमासाचे वैशिष्ट्य, हा सोहळा फक्त १५ जानेवारीपर्यंतच; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 07:00 IST

१५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा काळ धुंधुरमास म्हटला जातो, तो साजरा कसा करतात ते जाणून घ्या!

मनुष्य स्वभाव असा आहे, की तो कोणत्याही ऋतूत कुरकुरतच असतो. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो नाहीतर हिवाळा! तरीदेखील आवडता ऋतू कोणता, असे विचारल्यावर हिवाळ्याला बहुतांशी पसंती मिळते. कारण, या ऋतूमध्ये वर्षभरात साठलेल्या सुट्या, राहून गेलेल्या सहली आणि नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्साह असे बरेच काही दाटून आले असते. म्हणून इतर दोन ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्याचा उत्साह वेगळाच असतो. अनेकदा अलार्मपूर्वी जाग येते आणि धुक्याची पांघरलेली पहाट अनुभवण्याचा योग जुळून येतो. हे झुंजूमुंजू वातावरणच वैशिष्ट्य आहे धुंधुरमासाचे!

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. तर काही लोक झुंझुरमास असेही म्हणतात.या दिवसात भल्या पहाटे उठून मोसमी भाज्या, फळे खाल्ली जातात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो.

हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषत: रात्री गारठा जास्त जाणवतो. दिवस लहान व रात्र मोठी असते. शरीर थंड व जठराग्नि प्रज्वलित होतो. अर्थात भूक जास्त लागते. परंतु, त्याचवेळेस पचनक्रिया मंदावलेली असते, म्हणून पौष्टिक आहारावर भर दिला जातो. 

बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते, प्रबलोऽनल:भवति।

याचा परिणाम असा होतो, की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे-

दैघ्र्यात् निशानाम् एतर्ही, प्रात: एव बुभुक्षित: (भवति)।

आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो-अल्पेन्धनो धातून् स पचेत् 

अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.

हे सर्व टाळायचे अस, तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे.म्हणून धनुर्मासात प्रात: एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.

इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला अन्नपदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.

धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीfoodअन्न