शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:25 IST

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावे? ५ मुखी रुद्राक्षाचे लाभ काय? जाणून घेऊया...

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे केवळ सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते.

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ

रुद्राक्ष महादेवाचा अंश असल्याचे मानले जाते. हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते, जे स्वतः रुद्र आहे. पंचमुखी रुद्राक्ष गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाला समृद्धी, प्रगती, ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात. पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश, शिव, शक्ती, भगवान विष्णू आणि सूर्य देव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात. या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते. मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही. मनाचे स्थैर्य, शांतता आणि मानसिक बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा?

गुरु ग्रहाच्या अशुभ, प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आम्लपित्त, निद्रानाश आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, कोणीही ५ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे. म्हणून, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. तसेच, कला, संगीत, साहित्य, शिक्षक, तज्ज्ञ, पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.

५ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा? योग्य विधी कोणता?

महाशिवरात्रीला, पंचमी तिथीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक