शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:25 IST

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावे? ५ मुखी रुद्राक्षाचे लाभ काय? जाणून घेऊया...

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे केवळ सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते.

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ

रुद्राक्ष महादेवाचा अंश असल्याचे मानले जाते. हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते, जे स्वतः रुद्र आहे. पंचमुखी रुद्राक्ष गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाला समृद्धी, प्रगती, ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात. पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश, शिव, शक्ती, भगवान विष्णू आणि सूर्य देव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात. या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते. मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही. मनाचे स्थैर्य, शांतता आणि मानसिक बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा?

गुरु ग्रहाच्या अशुभ, प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आम्लपित्त, निद्रानाश आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, कोणीही ५ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे. म्हणून, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. तसेच, कला, संगीत, साहित्य, शिक्षक, तज्ज्ञ, पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.

५ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा? योग्य विधी कोणता?

महाशिवरात्रीला, पंचमी तिथीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक