शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:25 IST

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावे? ५ मुखी रुद्राक्षाचे लाभ काय? जाणून घेऊया...

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे केवळ सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते.

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ

रुद्राक्ष महादेवाचा अंश असल्याचे मानले जाते. हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते, जे स्वतः रुद्र आहे. पंचमुखी रुद्राक्ष गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाला समृद्धी, प्रगती, ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात. पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश, शिव, शक्ती, भगवान विष्णू आणि सूर्य देव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात. या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते. मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही. मनाचे स्थैर्य, शांतता आणि मानसिक बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा?

गुरु ग्रहाच्या अशुभ, प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आम्लपित्त, निद्रानाश आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, कोणीही ५ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे. म्हणून, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. तसेच, कला, संगीत, साहित्य, शिक्षक, तज्ज्ञ, पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.

५ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा? योग्य विधी कोणता?

महाशिवरात्रीला, पंचमी तिथीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक