शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:25 IST

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावे? ५ मुखी रुद्राक्षाचे लाभ काय? जाणून घेऊया...

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे केवळ सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते.

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ

रुद्राक्ष महादेवाचा अंश असल्याचे मानले जाते. हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते, जे स्वतः रुद्र आहे. पंचमुखी रुद्राक्ष गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाला समृद्धी, प्रगती, ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात. पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश, शिव, शक्ती, भगवान विष्णू आणि सूर्य देव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात. या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते. मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही. मनाचे स्थैर्य, शांतता आणि मानसिक बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा?

गुरु ग्रहाच्या अशुभ, प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आम्लपित्त, निद्रानाश आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, कोणीही ५ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे. म्हणून, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. तसेच, कला, संगीत, साहित्य, शिक्षक, तज्ज्ञ, पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.

५ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा? योग्य विधी कोणता?

महाशिवरात्रीला, पंचमी तिथीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक