शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

Ganesh Chaturthi 2023: १८ की १९ सप्टेंबर? गणपती नेमके कधी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:08 IST

Ganesh Chaturthi 2023: देशभरातील पंचांगात १८ आणि १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याचे म्हटले आहे. शास्त्रात काय म्हटले आहे? जाणून घेऊया...

Ganesh Chaturthi 2023: चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. अधिक श्रावण महिना आल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येत आहे. श्रावणातील सण-उत्सव साजरे करण्यासोबत गणपतीची तयारी सुरू केली जाते. मात्र, यंदा गणपती नेमके कधी? १८ की १९ सप्टेंबर रोजी? असा संभ्रम निर्माण होत असल्याची चर्चा आहे. याविषयी नेमके शास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया...

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Ganesh Chaturthi 2023 Date And Time)

यंदा गणपती नेमके कधी? १८ की १९ सप्टेंबर रोजी?

आपल्या देशात अनेक पंचांगे काढली जातात. त्या त्या प्रदेशात ती ती पंचांगे वापरून त्यानुसार व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात देशभरातील अनेक पंचांगात १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीने होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात काही पंचांगात गणेश चतुर्थीची तारीख १९ सप्टेंबर दाखवण्यात आली आहे. काही पंचांगाप्रमाणे १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी गणेश चतुर्थी लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर काही पंचांगात १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी गणेश चतुर्थीचा प्रारंभ दाखवण्यात आला आहे. 

शास्त्रानुसार गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याची योग्य वेळ कोणती?

गणपती कधी बसवावेत, याबाबत शास्त्रात काही माहिती देण्यात आली आहे. “चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते। मध्याह्नव्यापिनी चेत्स्यात् परश्चेत् परेऽहनीति॥”, असे शास्त्र सांगते. सूर्योदयापासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असली तरी मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे सांगितले गेले आहे. दुपारी ११ वाजून १५ मिनिटांपासून ते ०१ वाजून ४१ मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ असल्याचे शास्त्र सांगते. त्यामुळे या मध्यान्ह काळात चतुर्थी मिळणे आवश्यक असून, त्यानुसार गणपती पूजन करावे, असे सांगितले जात आहे. 

सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा

वास्तविक पाहता आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. पंचांगातही सूर्योदयाच्या तिथीप्रमाणे गोष्टी दिलेल्या असतात. प्रदोषकाळी करावयाची व्रते आणि संकष्ट चतुर्थी याला सूर्योदयाची तिथी धरली जात नाही. कारण, सदर व्रते संबंधित तिथी लागली की केली जातात. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व अधिक असल्यामुळे चतुर्थी तिथी लागली की, चंद्रोदयाची वेळ पाहून संकष्टी चतुर्थी धरली जाते. यंदाच्या गणेश चतुर्थीबाबत बोलायचे झाल्यास, मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सूर्योदयावेळी चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी दुपारी ०१ वाजून ४४ मिनिटांनी समाप्त होत आहे. मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे जे शास्त्रात सांगितले गेले आहे. ही बाब १९ सप्टेंबर रोजी लागू होते. यंदाच्या गणपतीचे विशेष म्हणजे गणपती मंगळवारी येत असल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. हा अत्यंत शुभ योग मानला गेला आहे. त्यामुळे आपापले कुळाचार, कुळधर्म आणि परंपरानुसार गणेश चतुर्थीला गणेश पूजन तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव