शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

जिल्ह्यात ६० लाख रोपांची लागवड करणार जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

बीड : येत्या जागतिक पर्यावरण दिनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने एक व्यक्ती तीन झाडे लावण्याचा संकल्प केला असून ठरवलेल्या कृती ...

बीड : येत्या जागतिक पर्यावरण दिनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने एक व्यक्ती तीन झाडे लावण्याचा संकल्प केला असून ठरवलेल्या कृती कार्यक्रमानुसार ६० लाख २९ हजार ४७९ झाडे लावण्यात येणार आहेत. शुक्रवारी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), यांची व्हीसी घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. दिवसेंदिवस कमी होत जाणारे झाडांचे प्रमाण व परिणामी त्याचा जैविक विविधतेवर होणारा दुष्परिणाम , अशुद्ध हवा यामुळे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २०२१ च्या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती, तीन झाडे’ याप्रमाणे लागवड करून जोपासना करण्याचे आवाहन केले आहे.

त्यायानुसार उपक्रमास गती देण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने एक कृती कार्यक्रम तयार केला आहे. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ असून या दिवशी वृक्ष लागवड २०११ चा शुभारंभ करण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गती देण्यासाठी तसेच वृक्ष संगोपनामध्ये सातत्य राहण्यासाठी पाच ग्रामपंचायतींसाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार असून दर आठवड्यास आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्यासाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट अहवाल सादर करतील.

----------

चांगल्या कामांचा पुरस्कार, कामचुकारांना शास्ती

वृक्षलागवड २०२१ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत व पंचायत समितींना पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शास्ती देण्याबाबतची कारवाईदेखील करण्यात येणार आहे.

------

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक घनदाट वृक्षलागवड

सर्व ग्रामपंचायतनिहाय लावावयाच्या रोपांचे स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे २० लाख ९ हजार ८२६ लोकसंख्या असून सुमारे ६० लक्ष २९ हजार ४७९ रोपांची लागवड करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक घनदाट वृक्ष लागवड जागा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार करण्यात येणार आहे.

--------