शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

राजकीय आरक्षणासाठी मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

बीड : ओबीसी समाजाचे नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरू ...

बीड : ओबीसी समाजाचे नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरू लागली आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाभरातून विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रां.प.सदस्य, नगरसेवक, सरंपच, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या बैठकीत जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून भविष्यात होणारे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहेत. तसेच लवकर भव्य मोर्चा जिल्हा कचेरीवर निघणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सकल ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत अनेकांनी भावाना व्यक्त केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य ते महापौरापर्यंतच्या पदावर ओबीसीचा माणूस कधीच बसू शकणार नाही. ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर हल्ला झाला आहे. कोणत्या सरकारची चूक आहे हे पाहण्यापेक्षा व्यापक आंदोलन उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी किंवा स्वत:च्या समाजाच्या प्रगतीसाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले.

बीड जिल्हा हा ओबीसींचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. व्यापक आंदोलन उभा करण्यासाठी जिल्हास्तरीय सकल ओबीसी समाज आंदोलन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये नमूद केले आहे की, ट्रिपल टेस्टमध्ये ओबीसी समाज यशस्वी झाला तर त्यांचे आरक्षण अबाधित राहणार आहे. त्यासाठी सरकाकडून जो आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्यांचा प्रमुख ओबीसी समाजाचा असावा. ज्याला समाजाच्या अडचणी माहित असाव्यात. तो प्रभावीपणे ओबीसींची बाजू मांडू शकेल. ओबीसींचे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरूणांचे भविष्य धोक्यात आले असून त्यामुळे हक्काचे व्यासपीठ मिळवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ओबीसी समाजाला आत्मविश्वास नडला असून झोपलेल्या ओबीसीने जागे होऊन सरकार विरोधात आंदोलनात सहभागी व्हावे. ओबीसींच्या प्रत्येक वाड्या, वस्त्या, गावपातळीवर जाऊन आपल्या हक्काचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने हिसकावून घेतले असल्याची जनजागृती करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.