शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

राजकीय आरक्षणासाठी मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

बीड : ओबीसी समाजाचे नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरू ...

बीड : ओबीसी समाजाचे नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरू लागली आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाभरातून विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रां.प.सदस्य, नगरसेवक, सरंपच, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या बैठकीत जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून भविष्यात होणारे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहेत. तसेच लवकर भव्य मोर्चा जिल्हा कचेरीवर निघणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सकल ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत अनेकांनी भावाना व्यक्त केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य ते महापौरापर्यंतच्या पदावर ओबीसीचा माणूस कधीच बसू शकणार नाही. ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर हल्ला झाला आहे. कोणत्या सरकारची चूक आहे हे पाहण्यापेक्षा व्यापक आंदोलन उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी किंवा स्वत:च्या समाजाच्या प्रगतीसाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले.

बीड जिल्हा हा ओबीसींचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. व्यापक आंदोलन उभा करण्यासाठी जिल्हास्तरीय सकल ओबीसी समाज आंदोलन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये नमूद केले आहे की, ट्रिपल टेस्टमध्ये ओबीसी समाज यशस्वी झाला तर त्यांचे आरक्षण अबाधित राहणार आहे. त्यासाठी सरकाकडून जो आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्यांचा प्रमुख ओबीसी समाजाचा असावा. ज्याला समाजाच्या अडचणी माहित असाव्यात. तो प्रभावीपणे ओबीसींची बाजू मांडू शकेल. ओबीसींचे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरूणांचे भविष्य धोक्यात आले असून त्यामुळे हक्काचे व्यासपीठ मिळवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ओबीसी समाजाला आत्मविश्वास नडला असून झोपलेल्या ओबीसीने जागे होऊन सरकार विरोधात आंदोलनात सहभागी व्हावे. ओबीसींच्या प्रत्येक वाड्या, वस्त्या, गावपातळीवर जाऊन आपल्या हक्काचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने हिसकावून घेतले असल्याची जनजागृती करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.