शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

दहावीनंतर अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी वाढली धावपळ अंबाजोगाई : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ ...

दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी वाढली धावपळ

अंबाजोगाई : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असून, विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

दहावीनंतर विद्यार्थी शक्यतो वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे इयत्ता अकरावीचे वर्ष हे रेस्ट इयर समजून, तसेच बारावीचे वर्षही सोपे जावे म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांची निवड करतात. विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सवलती दिल्या जातात. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तासिका करण्याची गरज नसते. तसेच चाचणी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे मार्क महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे देतात, अशी धारणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. काही महाविद्यालये अशा प्रकारची सवलतही देतात. बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. तसेच ग्रामीण भागात परीक्षेच्या कालावधीत कोणतेही बंधने नसतात. या ठिकाणी प्रात्यक्षिक व चाचणी परीक्षेचेही स्वरूपही विद्यार्थ्यांच्या मनावर असते. त्यामुळे गावात प्रवेश घेतले जातात.

म्हणून घेतला गावांत प्रवेश

शहरातील महाविद्यालयात रोज तास करण्याची अट घालण्यात येते. विशेषत: नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर रोज तास करणे अनिवार्य असते. त्यामुळे मग खासगी शिकवणी करण्यास वेळ मिळत नाही. तसेच बारावीलाही महाविद्यालये प्रात्यक्षिकात मनासारखे मार्क देत नाहीत.

- माउली जगताप, विद्यार्थी

शहरात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यासाठी चांगले मार्क घ्यावे लागतात. मग अशा वेळी शहराजवळ असलेल्या पण ग्रामीण भागात येणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे वाटते. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही. तसेच तास करण्याची गरज नाही.

- मुक्ता भिसे, विद्यार्थिनी

ऑफलाईन प्रवेश होणे गरजेचे.

दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी मुले विशेषतः ग्रामीण भागाची निवड करतात; कारण शहरातील महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अवघड समजली जाते. या ठिकाणी गुणवत्तेनुसार यादी प्रसिद्ध होऊन मगच प्रवेश दिला जातो.

- गोविंदराव देशमुख, संस्थाचालक

ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. तासिका व प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी इतरत्र खासगी क्लाससाठी जातात. म्हणून शहरातील शिस्तप्रिय महाविद्यालय त्यांना नको वाटते.

- संकेत मोदी, संस्थाचालक

अंबाजोगाई तालुक्यात प्रवेश देणारी महाविद्यालये- १२

गेल्या वर्षी किती अर्ज आले होते- ३२००

एकूण जागा- २८००

शिल्लक जागा- ४२