शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

दहावीनंतर अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी वाढली धावपळ अंबाजोगाई : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ ...

दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी वाढली धावपळ

अंबाजोगाई : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असून, विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

दहावीनंतर विद्यार्थी शक्यतो वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे इयत्ता अकरावीचे वर्ष हे रेस्ट इयर समजून, तसेच बारावीचे वर्षही सोपे जावे म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांची निवड करतात. विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सवलती दिल्या जातात. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तासिका करण्याची गरज नसते. तसेच चाचणी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे मार्क महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे देतात, अशी धारणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. काही महाविद्यालये अशा प्रकारची सवलतही देतात. बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. तसेच ग्रामीण भागात परीक्षेच्या कालावधीत कोणतेही बंधने नसतात. या ठिकाणी प्रात्यक्षिक व चाचणी परीक्षेचेही स्वरूपही विद्यार्थ्यांच्या मनावर असते. त्यामुळे गावात प्रवेश घेतले जातात.

म्हणून घेतला गावांत प्रवेश

शहरातील महाविद्यालयात रोज तास करण्याची अट घालण्यात येते. विशेषत: नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर रोज तास करणे अनिवार्य असते. त्यामुळे मग खासगी शिकवणी करण्यास वेळ मिळत नाही. तसेच बारावीलाही महाविद्यालये प्रात्यक्षिकात मनासारखे मार्क देत नाहीत.

- माउली जगताप, विद्यार्थी

शहरात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यासाठी चांगले मार्क घ्यावे लागतात. मग अशा वेळी शहराजवळ असलेल्या पण ग्रामीण भागात येणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे वाटते. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही. तसेच तास करण्याची गरज नाही.

- मुक्ता भिसे, विद्यार्थिनी

ऑफलाईन प्रवेश होणे गरजेचे.

दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी मुले विशेषतः ग्रामीण भागाची निवड करतात; कारण शहरातील महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अवघड समजली जाते. या ठिकाणी गुणवत्तेनुसार यादी प्रसिद्ध होऊन मगच प्रवेश दिला जातो.

- गोविंदराव देशमुख, संस्थाचालक

ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. तासिका व प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी इतरत्र खासगी क्लाससाठी जातात. म्हणून शहरातील शिस्तप्रिय महाविद्यालय त्यांना नको वाटते.

- संकेत मोदी, संस्थाचालक

अंबाजोगाई तालुक्यात प्रवेश देणारी महाविद्यालये- १२

गेल्या वर्षी किती अर्ज आले होते- ३२००

एकूण जागा- २८००

शिल्लक जागा- ४२