शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पावसासाठी अख्खं गाव कोळाईच्या दरबारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:13 IST

पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे.

ठळक मुद्देपाऊस पाड गं आता नको अंत पाहू : दुष्काळात आधार वाटणाऱ्या ग्रामदेवतेला घराबाहेर पडून घातले साकडे

विजयकुमार गाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर छावण्या बंद झाल्याने दावणीवरचे जनावरे उपाशीपोटी हंबरडा फोडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. येईल येईल असा अंदाज पावसाने खोटा ठरवला. हतबल झालेले ग्रामस्थ अखेर ग्राम दैवताला साकडे घालण्यासाठी व शरणागती पत्करण्यासाठी निघाले. ‘आता तूच तारण हार’ या भावनेतून अख्खं गाव शुक्रवारी घराबाहेर पडून ग्राम दैवताच्या दरबारात धरणे धरून बसला होता. ज्या ज्या वेळी अशी दुष्काळ परिस्थती निर्माण झाली त्या त्या वेळी गाव असाच बाहेर पडत असल्याचे वयस्क ग्रामस्थ बोलत होते.तालुक्यातील कोळवाडी गावात पश्चिमेला कोळाई हे ग्रामदैवत आहे. सिंदफणेच्या काठावर या लहान मंदिराच्या मागे शिळेचा मारुती व भुताचा राजा वेताळ ही दैवत उघड्यावर आहेत. जुलै संपत आलातरी पावसाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवल्याने गतवर्षीच्या दुष्काळ पोटी पुन्हा दुसरा दुष्काळ जन्म घेतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नद्या वाहण्याच्या काळात टँकरचे पाणी प्यावे लागते तर डोंगरावरील मोकळा हिरवा चारा खाऊन मस्तावलेल्या जनावरांचे हुंबरण्याऐवजी दावणीवरच जनावरांचा उपाशी पोटी हंबरडा ऐकू येत आहे. या संकटातून आता फक्त कोळाई हे दैवत एकमेव आधार वाटत असल्याने याही वर्षी हे ग्रामस्थ गाव रिकामं करून देवीच्या दरबात हजर झाले. कोळवाडीत सव्वादोनशे कुटुंब असून जवळपास पावणेदोन हजार लोकसंख्या आहे. शुक्रवारी गावातील प्रत्येक घरातून महिला, पुरुषांसह अबालवृद्ध मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसReligious programmeधार्मिक कार्यक्रम