शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांचा काळा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:40 IST

शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला.

ठळक मुद्देदप्तर अंबाजोगाईत, खरेदी माजलगावला : आॅनलाईन नोंदणी फंड्यात व्यापाऱ्यांचा ‘धंदा’

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर शासनाने महसूल व सहायक निबंधकांच्या पथकाद्वारे केलेल्या पंचनाम्यातून आणखीही बºयाच बाबी उघड होत असून, शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांनी मोठा काळा बाजार केल्याचे किमान पंचनाम्यावरुन निदर्शनास येत आहे.माजलगांव येथे शीतल कृषि निविष्ठा सहकारी संस्था, गिरवली या सहकारी संस्थेला मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नियुक्त केले आहे. खरेदीसाठी अधिकृतरित्या सदर संस्थेची नियुक्ती जरी शासनाने केली असली तरी येथील कांही पांढरपेशा नेत्यांनी या सहकारी संस्थेला हाताशी धरुन आर्थिक तडजोड करीत शेतकरी नोंदणीचे काम आपल्या हाती ठेवले. १५ दिवसांपासून नोंदणीचे काम सुरु झाल्यानंतर सुमारे १२०० शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्चात अद्यापही एकाही शेतकºयाला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही. तसेच खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. मात्र, बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहून शंका आल्यामुळे शेतकºयांनी आरडाओरड सुरु केली. सदर ठिकाणी मापे सुरु असून शासकीय बारदाण्यात माल भरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. केंद्र सुरु नसताना कोणाचा माल अगोदरच खरेदी केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात होती. कारण येथे कोणत्याही शेतकºयाला माहिती, मोबाईल संदेश, टोकन इत्यादी काहीच प्रक्रिया घडली नाही. मग हा माल आला कोठून असाही प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी संतापले. त्यांनी या सर्व छुप्या खरेदीचा पंचनामा प्रशासनाने करण्याची मागणी केली.शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता महसूल विभाग आणि सहायक निबंधकांच्या संयुक्त पथकाने पंचनामा केला. पंचनाम्यातून अनेक बाबी उघड झाल्या असून, सदर बोगस खरेदी बाबतचा एकही दस्तऐवज या ठिकाणी आढळला नाही. पथकातील अधिकाºयांनी परवानगी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे ही अंबाजोगाई येथील संस्थेच्या कार्यालयात असल्याचे सांगितले. शेतकरी नोंदणी, टोकन इत्यादी कसल्याही प्रकारचे अभिलेखे येथील संस्थेच्या कर्मचाºयाकडे आढळले नाहीत. पंचनाम्यावरुन सर्वच कडधान्य खरेदी ही बोगस असल्याचे सिध्द होत असल्याने हा संपूर्ण माल शासनाने ताब्यात घेण्याची मागणी शेतकºयांनी केली.शासकीय खरेदीसाठी सक्षम नसल्याचे दाखवून केवळ आॅनलाईन नोंदणीचे काम खरेदीविक्री संघाने आपल्याकडे घेतले ते कशासाठी याची उकल आता होत आहे. व्यापाºयांनी सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना कमी भावाने खरेदी केलेला मूग, उडीद, सोयाबीन हा माल सर्वात अगोदर शासनाला खपवून आपले उखळ पांढरे करण्यासाठी हा सर्व प्रताप घडवून आणल्याचे निदर्शनास येत आहे.पणन मंत्र्यांकडे तक्रारशासकीय खरेदी केंद्रावर पदाचा गैरफायदा घेवून शेतकºयांच्या आडून व्यापाºयांना फायदा पोहचविण्यासाठीच्या घडलेल्या प्रकाराची तक्रार पणन मंत्र्यांकडे आ.आर.टी. देशमुख करणार असल्याची माहिती भाजपाचे नितीन नाईकनवरे यांनी दिली.शेतकरी झाले त्रस्त१५ दिवसांपासून नोंद करुन ठेवलेल्या एकाही शेतकºयाचा छटाकभरही माल अजून खरेदी केंद्रावर नाही. त्यात घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे खरा शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे. आतातर आॅनलाईन नोंदणी देखील चालू नसल्यामुळे आता माल कोठे विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजी