शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांचा काळा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:40 IST

शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला.

ठळक मुद्देदप्तर अंबाजोगाईत, खरेदी माजलगावला : आॅनलाईन नोंदणी फंड्यात व्यापाऱ्यांचा ‘धंदा’

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर शासनाने महसूल व सहायक निबंधकांच्या पथकाद्वारे केलेल्या पंचनाम्यातून आणखीही बºयाच बाबी उघड होत असून, शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांनी मोठा काळा बाजार केल्याचे किमान पंचनाम्यावरुन निदर्शनास येत आहे.माजलगांव येथे शीतल कृषि निविष्ठा सहकारी संस्था, गिरवली या सहकारी संस्थेला मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नियुक्त केले आहे. खरेदीसाठी अधिकृतरित्या सदर संस्थेची नियुक्ती जरी शासनाने केली असली तरी येथील कांही पांढरपेशा नेत्यांनी या सहकारी संस्थेला हाताशी धरुन आर्थिक तडजोड करीत शेतकरी नोंदणीचे काम आपल्या हाती ठेवले. १५ दिवसांपासून नोंदणीचे काम सुरु झाल्यानंतर सुमारे १२०० शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्चात अद्यापही एकाही शेतकºयाला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही. तसेच खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. मात्र, बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहून शंका आल्यामुळे शेतकºयांनी आरडाओरड सुरु केली. सदर ठिकाणी मापे सुरु असून शासकीय बारदाण्यात माल भरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. केंद्र सुरु नसताना कोणाचा माल अगोदरच खरेदी केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात होती. कारण येथे कोणत्याही शेतकºयाला माहिती, मोबाईल संदेश, टोकन इत्यादी काहीच प्रक्रिया घडली नाही. मग हा माल आला कोठून असाही प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी संतापले. त्यांनी या सर्व छुप्या खरेदीचा पंचनामा प्रशासनाने करण्याची मागणी केली.शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता महसूल विभाग आणि सहायक निबंधकांच्या संयुक्त पथकाने पंचनामा केला. पंचनाम्यातून अनेक बाबी उघड झाल्या असून, सदर बोगस खरेदी बाबतचा एकही दस्तऐवज या ठिकाणी आढळला नाही. पथकातील अधिकाºयांनी परवानगी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे ही अंबाजोगाई येथील संस्थेच्या कार्यालयात असल्याचे सांगितले. शेतकरी नोंदणी, टोकन इत्यादी कसल्याही प्रकारचे अभिलेखे येथील संस्थेच्या कर्मचाºयाकडे आढळले नाहीत. पंचनाम्यावरुन सर्वच कडधान्य खरेदी ही बोगस असल्याचे सिध्द होत असल्याने हा संपूर्ण माल शासनाने ताब्यात घेण्याची मागणी शेतकºयांनी केली.शासकीय खरेदीसाठी सक्षम नसल्याचे दाखवून केवळ आॅनलाईन नोंदणीचे काम खरेदीविक्री संघाने आपल्याकडे घेतले ते कशासाठी याची उकल आता होत आहे. व्यापाºयांनी सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना कमी भावाने खरेदी केलेला मूग, उडीद, सोयाबीन हा माल सर्वात अगोदर शासनाला खपवून आपले उखळ पांढरे करण्यासाठी हा सर्व प्रताप घडवून आणल्याचे निदर्शनास येत आहे.पणन मंत्र्यांकडे तक्रारशासकीय खरेदी केंद्रावर पदाचा गैरफायदा घेवून शेतकºयांच्या आडून व्यापाºयांना फायदा पोहचविण्यासाठीच्या घडलेल्या प्रकाराची तक्रार पणन मंत्र्यांकडे आ.आर.टी. देशमुख करणार असल्याची माहिती भाजपाचे नितीन नाईकनवरे यांनी दिली.शेतकरी झाले त्रस्त१५ दिवसांपासून नोंद करुन ठेवलेल्या एकाही शेतकºयाचा छटाकभरही माल अजून खरेदी केंद्रावर नाही. त्यात घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे खरा शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे. आतातर आॅनलाईन नोंदणी देखील चालू नसल्यामुळे आता माल कोठे विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजी