शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जुने घोंगडे भिजत असताना, नवीन योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:25 IST

जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना : बीड जिल्ह्यात जुन्या २५६ योजनांची कामे अर्धवट, नवीन २४९ योजना मंजूर

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना प्रशासनाच्या वतीने किती पारदर्शक पद्धतिने राबवल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांच्या माध्यमातून यापुर्वी २५६ योजना राबवण्यात आल्या होत्या, मात्र त्यापैकी बहुतांश योजना अर्धवट असून, मोठ्या प्रमाणात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यापैकी अनेक प्रकरणामध्ये गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणांची चौकशी अंत्यंत संथ गतीने सुरू असून कुठल्याही प्रकराची कारवाई केली गेली नाही.जुनी प्रकरणे ताजी असताना यावर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून २४९ योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने ८६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनांचा फायदा जवळपास ३०० वाड्या वस्त्या व गावांना होणार आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांप्रमाणे या योजना रबवल्या जाऊ नयेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.प्रत्येक गावामध्ये जलसाठा उपलब्ध असलेल्या ठिकाणावरुन नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, मात्र या योजनेअंतर्गर यापूर्वी गाव पातळीवर समिती नेमून कामे करण्यात आली होती. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. यापैकी ४२ गावातील प्रकरणांची कायदेशीर चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरु असून, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशय कामे न झालेल्या गावताली नागरिकांनी व्यक्त केला आहे.यापर्वीच्या योजना अर्धवट असताना नवीन योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी ही कामे ई-टेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते एस. यू. खंडारे यांनी दिली.२५६ योजना अपूर्णचयापुर्वी जिल्ह्यात २५६ योजना राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून रबावण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी ४२ योजना प्रगतीपथावर आहेत, १५४ योजना आर्थिक कारणांमुळे बंद आहेत, तर ६० योजनांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे यापैकी एकही योजना पूर्ण नसून, काही योजनांची भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी सुरु आहे उर्वरित कामे रखडली आहेत.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी