शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:28 IST

पूर्वी दळणवळणासाठी  गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते.

ठळक मुद्देविड्यातल्या या अनोख्या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत.जावयाच्या मिरवणुकीसाठी गाढव हे महत्त्वाचे साधन होते.

- विनोद ढोबळे 

विडा (जि. बीड) : धूलिवंदनाच्या दिवशी केज तालुक्यातील विडा येथे जावयाला गाढवावरून बसवून गावात मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या ८५ वर्षांपासून आहे; परंतु मागील काही वर्षांत गाढवांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे गाव जावयाची शिकार आणि त्याला मिरविण्यासाठी गाढवाचा शोध अशी कसरत विडेकरांना आतापासूनच करावी लागत आहे. 

विड्याचे ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला होळीच्या दिवशी गावकऱ्यांनी थट्टामस्करी करीत गाढवावर बसवले आणि तेंव्हापासून दरवर्षी हाच पायंडा पडत गेला. विड्यातल्या या अनोख्या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जावयाच्या मिरवणुकीसाठी गाढव हे महत्त्वाचे साधन होते. पूर्वी दळणवळणासाठी  गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते. गावात जीवन गायकवाड यांच्याकडे गाढव असायचे. वीसपेक्षा जास्त गाढवं त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्याकडील गाढव गावकरी उत्सवासाठी विनामूल्य वापरायचे. कालांतराने गाढवांची संख्या कमी होत गेली. गावात मागच्या वर्षी शेवटचे गाढव आजारपणाने मरण पावले. त्यावेळी हिवरापहाडी गावातून गाढव भाड्याने आणले होते. यंदा मंगळवारी धुळवड असल्याने एकीकडे जावयाचा शोध सुरु झाला आहे तर गाढव शोधण्याचे मोठे आव्हान विडेकरांसमोर आहे. 

गावकरी सज्जगावात जावयाची गाढवावर मिरवणूक काढली जाते. सध्या जावयाची शोध मोहीम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर चांगले गाढवदेखील गावकरी शोधत असल्याचे उपसरपंच बी. आर. देशमुख म्हणाले. धुळवडीच्या या मोहिमेसाठी गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत,सूरज पटाईत,पप्पू सिरसाट, विकास वाघमारेसह ग्रामस्थ मात्र सज्ज झाले आहे.  

टॅग्स :HoliहोळीBeedबीड