शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST

बीड : अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच ...

बीड : अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप मात्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या धान्याचे वाटप लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास १५ दिवस होत आहेत; परंतु अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल अशी शक्यता आहे. याचवेळी केंद्र शासनाकडूनदेखील मोफत धान्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, केंद्राकडूनदेखील मोफत धान्य वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन धान्य वाटप करावे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या योजनेमधून एपीएल शेतकरी कुटुंबाला वगळण्यात आले असून, त्यांना ३ रुपये प्रति किलो तांदूळ व २ रुपये प्रति किलो गहू याप्रमाणे लाभ मिळणार आहे. त्या कुटुंबांची संख्या जवळपास ५ लाख ४० हाजार ५४७ एवढी आहे.

मोफत धान्य मिळणारे एकूण रेशनकार्डधारक कुटुंबाची संख्या- ३८९६५७

अंत्योदय -४०२८८

केशरी - ३४९३६९

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा ?

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे.

-राजेश गालफाडे

दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासानाने घोषणा केली, मात्र, धान्याचे वाटप अद्याप सुरू झाले नाही. रेशन दुकानातून मोफत धान्य तात्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे यासंदर्भात मात्र काहीच माहिती नाही.

-रोहित काळे

गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. मात्र, आणखी हातचे काम गेले आहे. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप तात्काळ करावे.

-राजू विद्यागर

मोफत धान्य काय मिळणार

रेशन दुकानावर अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २३ किलो गहू व १२ किलो तांदूळ तर, प्राधान्य कुटुंब योजना गटातील कार्डधारकांना २ किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत.

....

मोफत धान्याचे वाटप अनेक ठिकाणी सुरू झाले आहे. सर्व लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या आहेत. -नामदेव टिळेकर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.