शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

धनगर समाजाच्या जल्लोषाची तारीख कधी ?  : भारत सोन्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:26 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते.

बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते. त्यानंतर आज चार वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावलेला नाही. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी यशवंत सेनेचे नेते भारत सोन्नर यांनी केली आहे.

धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी टीस या संस्थेला या सरकारने काम दिले होते. आरक्षणाचा सर्व अभ्यास करून चार वर्षांनंतर हा अहवाल संस्थेने सरकारकडे दिला आहे. त्यांनंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी, एक महिना या अहवालाचा अभ्यास करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल व याची शिफारस केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्री यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसत आहे. केवळ केंद्र शासनाकडे अहवाल पाठविले एवढेच काम नाही तर त्याचा तात्काळ पाठपुरवठा  करून धनगर आरक्षणाची अमलबजावणी झाली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन सोन्नर यांनी केले.

ज्या वेळेस धनगर समाजाला जातीचे प्रमाणपत्र हातात पडतील, त्याच वेळेस धनगर समाजाला आरक्षण मिळेल; परंतु हे सरकार केवळ चालढकल करीत आहे आगामी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा व धनगरांना जल्लोषाची तारीख सांगावी. आता धनगरांचा अंत पाहू नका, अन्यथा  यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने आंदोलनाचा इशाराही भारत सोन्नर यांनी दिला

टॅग्स :reservationआरक्षणBeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीState Governmentराज्य सरकार