शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली ...

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा, याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच सूचना नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये सध्या संभ्रम आहे. तर दाखल्यावर शाळा सोडण्याचे कारण म्हणून कोणता शेरा येणार, याबाबत पालक आणि विद्यार्थीदेखील प्रतीक्षा करीत आहेत. परीक्षेच्या तारखेचा व निकालाचा महिना मार्च, एप्रिल, मे की जून याबाबत जवळपास सात हजार मुख्याध्यापकांनी परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन मागितले होते. दाखला देताना विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, परीक्षेचा महिना याबाबत मंडळाचे परिपत्रक येईपर्यंत अनिश्चितता आहे. दोन- तीन दिवसांत ती दूर होईल, अशी आशा शाळांच्या मुख्याध्यापकांना आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा -

दहावीतील एकूण विद्यार्थी -४०५४०

पास झालेले विद्यार्थी - ४०५२२

मुख्याध्यापक म्हणतात -

नववी आणि दहावीचे मूल्यमापन करून लागलेला निकाल व्यवस्थित व समाधानकारक आहे. प्रतिकूल परिस्थितीत शासनाने चांगला व योग्य निर्णय घेतला. बोर्डाकडून उपलब्ध झाल्यानंतर गुणपत्रिका व दाखला देण्यात येणार आहे. ही कागदपत्रे देताना कुठलीही अडचण येणार नाही.

- दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड.

------------

दाखला देण्याबाबत किंवा शेरा लिहिण्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर ८-१० दिवसांत बोर्डाकडून गुणपत्रक येतील, त्यानंतर दाखले दिले जातात. दाखल्यावर निकालाचा शेरा उल्लेखाबाबत अडचण येणार नाही. - राजकुमार कदम, उपमुख्याध्यापक, श्री. शिवाजी विद्यालय, बीड.

------------

पालक म्हणतात...

कोरोनामुळे नववी आणि दहावीचे मूल्यांकन करून निकाल लागला आहे, तो योग्य वाटतो. पुढील शिक्षणासाठी शाळा सोडताना लागणाऱ्या दाखल्याबाबत पालक म्हणून कोणतीही शंका नाही. शासन व शाळा विद्यार्थ्याचे हित पाहूनच योग्य निर्णय घेतील. - शिवाजी सोनके, पालक, बीड.

--------

कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी परीक्षेची मूल्यांकन पध्दत व निकाल योग्य राहिला. परंतु नेहमीप्रमाणे परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी सिद्ध होऊ शकली नाही. निकाल लागल्याने दाखला मिळणारच आहे. त्याबाबत पालक म्हणून कोणताही संभ्रम नाही. - अशोक हावळे, पालक, बीड.

------

अडचण येणार नाही

इयत्ता दहावीचा निकाल शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार मूल्यांकन करून लागला आहे. शाळा सोडताना दाखल्यावर शेरा काय लिहावा याबाबत बोर्डाकडून मार्गदर्शन होईल. त्यामुळे कोणत्याही शाळेला अथवा विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. - डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.) बीड.

-------------