शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली ...

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा, याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच सूचना नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये सध्या संभ्रम आहे. तर दाखल्यावर शाळा सोडण्याचे कारण म्हणून कोणता शेरा येणार, याबाबत पालक आणि विद्यार्थीदेखील प्रतीक्षा करीत आहेत. परीक्षेच्या तारखेचा व निकालाचा महिना मार्च, एप्रिल, मे की जून याबाबत जवळपास सात हजार मुख्याध्यापकांनी परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन मागितले होते. दाखला देताना विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, परीक्षेचा महिना याबाबत मंडळाचे परिपत्रक येईपर्यंत अनिश्चितता आहे. दोन- तीन दिवसांत ती दूर होईल, अशी आशा शाळांच्या मुख्याध्यापकांना आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा -

दहावीतील एकूण विद्यार्थी -४०५४०

पास झालेले विद्यार्थी - ४०५२२

मुख्याध्यापक म्हणतात -

नववी आणि दहावीचे मूल्यमापन करून लागलेला निकाल व्यवस्थित व समाधानकारक आहे. प्रतिकूल परिस्थितीत शासनाने चांगला व योग्य निर्णय घेतला. बोर्डाकडून उपलब्ध झाल्यानंतर गुणपत्रिका व दाखला देण्यात येणार आहे. ही कागदपत्रे देताना कुठलीही अडचण येणार नाही.

- दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड.

------------

दाखला देण्याबाबत किंवा शेरा लिहिण्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर ८-१० दिवसांत बोर्डाकडून गुणपत्रक येतील, त्यानंतर दाखले दिले जातात. दाखल्यावर निकालाचा शेरा उल्लेखाबाबत अडचण येणार नाही. - राजकुमार कदम, उपमुख्याध्यापक, श्री. शिवाजी विद्यालय, बीड.

------------

पालक म्हणतात...

कोरोनामुळे नववी आणि दहावीचे मूल्यांकन करून निकाल लागला आहे, तो योग्य वाटतो. पुढील शिक्षणासाठी शाळा सोडताना लागणाऱ्या दाखल्याबाबत पालक म्हणून कोणतीही शंका नाही. शासन व शाळा विद्यार्थ्याचे हित पाहूनच योग्य निर्णय घेतील. - शिवाजी सोनके, पालक, बीड.

--------

कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी परीक्षेची मूल्यांकन पध्दत व निकाल योग्य राहिला. परंतु नेहमीप्रमाणे परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी सिद्ध होऊ शकली नाही. निकाल लागल्याने दाखला मिळणारच आहे. त्याबाबत पालक म्हणून कोणताही संभ्रम नाही. - अशोक हावळे, पालक, बीड.

------

अडचण येणार नाही

इयत्ता दहावीचा निकाल शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार मूल्यांकन करून लागला आहे. शाळा सोडताना दाखल्यावर शेरा काय लिहावा याबाबत बोर्डाकडून मार्गदर्शन होईल. त्यामुळे कोणत्याही शाळेला अथवा विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. - डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.) बीड.

-------------