शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक गावात मागणी असून देखील टँकर सुरु करण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या वतीने पुन्हा पाहणी करुन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. गावात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर अनेक वेळा मागणी करुन देखील टँकर सुरु करण्यात आले नव्हते. नागरिकांनी टँकरसाठी आंदोलन व मागणीचा रेटा लाऊन धरल्यामुळे १४ शासकीय, तर २१६ खाजगी टँकरच्या माध्यमतून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील अनेक गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, ग्रामपंचायतच्या वतीने तेथील प्रस्ताव मागवण्यात आले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून टँकर सुरु करण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. मात्र, या सर्व प्रशासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे टँकर सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ टँकर सुरु करावेत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी भरलेल्या निविदांची सोडत प्रक्रिया १६ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater transportजलवाहतूक