शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक गावात मागणी असून देखील टँकर सुरु करण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या वतीने पुन्हा पाहणी करुन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. गावात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर अनेक वेळा मागणी करुन देखील टँकर सुरु करण्यात आले नव्हते. नागरिकांनी टँकरसाठी आंदोलन व मागणीचा रेटा लाऊन धरल्यामुळे १४ शासकीय, तर २१६ खाजगी टँकरच्या माध्यमतून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील अनेक गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, ग्रामपंचायतच्या वतीने तेथील प्रस्ताव मागवण्यात आले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून टँकर सुरु करण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. मात्र, या सर्व प्रशासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे टँकर सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ टँकर सुरु करावेत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी भरलेल्या निविदांची सोडत प्रक्रिया १६ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater transportजलवाहतूक