शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक गावात मागणी असून देखील टँकर सुरु करण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या वतीने पुन्हा पाहणी करुन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. गावात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर अनेक वेळा मागणी करुन देखील टँकर सुरु करण्यात आले नव्हते. नागरिकांनी टँकरसाठी आंदोलन व मागणीचा रेटा लाऊन धरल्यामुळे १४ शासकीय, तर २१६ खाजगी टँकरच्या माध्यमतून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील अनेक गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, ग्रामपंचायतच्या वतीने तेथील प्रस्ताव मागवण्यात आले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून टँकर सुरु करण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. मात्र, या सर्व प्रशासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे टँकर सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ टँकर सुरु करावेत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी भरलेल्या निविदांची सोडत प्रक्रिया १६ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater transportजलवाहतूक