शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:08 IST

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी वर्ग समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते.

बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासन बेजार झाले असून आठवड्यात काम पूर्ण न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. 

पाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता. समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते. टाकीचे अर्धवट काम तसेच रखडले आहे. 

पाणी वितरण व्यवस्था केली नाही तसेच संपूर्ण गावभर पाईपलाईन करणे आवश्यक असताना तसे न करता योजना पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु जि.प. कडून समितीशी  पत्रव्यवहार केला जात आहे. अखेर १९ मे रोजी उपोषण करण्यात आले. पिंपरखेड व परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. हातपंप कोरडे पडले आहेत. गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याने टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे टंचाईला वैतागलेले ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

मालमत्तेवर निधीचा बोजासमितीच्या कारभाराबद्दल तक्रारी वाढत असल्याने जि. प. प्रशासनाला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी समितीच्या अध्यक्ष व सचिवांना प्राप्त निधीतून योजनेची कामे आठ दिवसात पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. नसता निधी वसुलीसाठी फौैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निधीचा बोजा संबंधितांच्या मालगीच्या स्थावर मालमत्तेवर चढवण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. 

गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलन शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ग्राम पाणी पुरवठा समितीच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच्या खात्यातील रक्कम काहीच कामे न करता समितीला दिली, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करावी. दोषींवर गुन्हा नोंद  न झाल्यास महिला, पुरुष ग्रामस्थांसोबत पाणी मांगो आंदोलन करावे लागेल.- राम शिंदे, पिंपरखेड

टॅग्स :WaterपाणीBeedबीड