शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:08 IST

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी वर्ग समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते.

बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासन बेजार झाले असून आठवड्यात काम पूर्ण न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. 

पाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता. समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते. टाकीचे अर्धवट काम तसेच रखडले आहे. 

पाणी वितरण व्यवस्था केली नाही तसेच संपूर्ण गावभर पाईपलाईन करणे आवश्यक असताना तसे न करता योजना पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु जि.प. कडून समितीशी  पत्रव्यवहार केला जात आहे. अखेर १९ मे रोजी उपोषण करण्यात आले. पिंपरखेड व परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. हातपंप कोरडे पडले आहेत. गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याने टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे टंचाईला वैतागलेले ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

मालमत्तेवर निधीचा बोजासमितीच्या कारभाराबद्दल तक्रारी वाढत असल्याने जि. प. प्रशासनाला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी समितीच्या अध्यक्ष व सचिवांना प्राप्त निधीतून योजनेची कामे आठ दिवसात पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. नसता निधी वसुलीसाठी फौैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निधीचा बोजा संबंधितांच्या मालगीच्या स्थावर मालमत्तेवर चढवण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. 

गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलन शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ग्राम पाणी पुरवठा समितीच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच्या खात्यातील रक्कम काहीच कामे न करता समितीला दिली, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करावी. दोषींवर गुन्हा नोंद  न झाल्यास महिला, पुरुष ग्रामस्थांसोबत पाणी मांगो आंदोलन करावे लागेल.- राम शिंदे, पिंपरखेड

टॅग्स :WaterपाणीBeedबीड