शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शुद्धीकरण न करताच माजलगावकरांना पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

माजलगाव : चिंचगव्हाण येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून माजलगाव शहर व ११ पुनर्वसित गावांना मागील अडीच वर्षांपासून विनाफिल्टर ...

माजलगाव : चिंचगव्हाण येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून माजलगाव शहर व ११ पुनर्वसित गावांना मागील अडीच वर्षांपासून विनाफिल्टर केलेले पाणी पिण्याची वेळ आली. सहा महिन्यांपूर्वी या फिल्टर दुरुस्तीचे टेंडर काढूनही केवळ वर्कऑर्डर न दिल्याने हे या गावातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.

माजलगाव धरणातून माजलगाव शहर व ११ पुनर्वसित गावातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९८५ मध्ये तत्कालीन आ. बाजीराव जगताप यांच्या कार्यकाळात जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून योजना केली होती. धरणाच्या बाजूला विहीर घेऊन त्यातील पाणी बाजूलाच असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्ध करूनच या सर्व गावांना देण्याची ही योजना होती. या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मागील अडीच तीन वर्षांपासून केवळ दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे धूळ खात पडून आहे. धरणातून आलेले पाणी फिल्टर होत नसल्यामुळे ते थेट नळाद्वारे नागरिकांना मिळत आहे. यामुळे या गावातील नागरिकांना मागील अडीच-तीन वर्षांपासून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या फिल्टर दुरुस्तीसाठी ६ ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी टेंडर काढले होते. यात पाचजणांनी टेंडर भरलेदेखील होते.

हे टेंडर ओपन केले. कमी रकमेच्या टेंडरधारकास हे टेंडर दिले; परंतु त्यांनी बिलाची रक्कमच भरली नसल्यामुळे हे टेंडर त्याला दिले नसल्याचे नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. पहिल्या टेंडरधारकाच्या चुकीमुळे त्याला नगरपालिकेने नोटीस देऊन दुसऱ्या टेंडरधारकास काम देणे आवश्यक असताना तो टेंडरधारक आपल्या जवळचा नाही किंवा त्याच्याकडून चिरीमिरी मिळण्याचा अंदाज नसल्यामुळे त्यास नगरपालिकेने टेंडर दिले नसल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे. पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचा फायदा होत नसल्याने त्यांनी फिल्टर दुरुस्तीची वर्कऑर्डर न करता केवळ लिकेज काढणाऱ्यांकडून हे फिल्टर फक्त घेऊन नागरिकांना अशुद्ध पाणी पाजण्याचे काम यांनी केले आहे.

नगरपालिकेकडे फिल्टर दुरूस्तीसाठी पैसे उपलब्ध असताना आपला फायदा होणार नाही, या कारणामुळे टेंडर काढूनही वर्कऑर्डर दिली नसल्याचे बोलले जाते. मात्र याबाबत ना सत्ताधारी नगरसेवक बोलतात ना विरोधी नगरसेवक बोलतात. नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या फायदयासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचे यावरून दिसत आहे.

फिल्टर दुरूस्ती म्हणजे काय?

फिल्टर दुरुस्तीचे टेंडर जवळपास ३५ लाखाला निघाले आहे. या टेंडरधारकांनी या ठिकाणची वाळू बदलणे, व्हॉल चेंज करणे, फ्लोरिंग बदलणे (फरशी बदलणे), पंपांचे सर्व्हिसिंग व रिपेअरी आदी बाबींची दुरूस्ती करायची आहे.

सहा महिन्यांपूर्वी कमी रकमेचे टेंडर भरणाऱ्यास टेंडर दिले होते; परंतु त्याने अनेक दिवस कामालाच सुरुवात केली नाही. तो न्यायालयात जाईल त्यामुळे दुसऱ्या नंबरच्या व्यक्तीला टेंडर देता आले नाही. लवकरच याचे पुन्हा टेंडर पुकारण्यात येईल. तोपर्यंत फिल्टरची स्वच्छता करण्यात आली आहे.

--- शेख मंजूर, नगराध्यक्ष, न. प., माजलगाव

===Photopath===

290421\img_20201119_132014_14.jpg