शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १८ विहिरींचे अधिग्रहण, १ टँकर सुरू

By शिरीष शिंदे | Updated: December 30, 2023 16:36 IST

गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे.

बीड : पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात १८ विहिरी - बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे.

पाण्याची मागणी वाढत असल्याने जिल्हा परिषदेने १८ विहिरी - बोअरचे अधिग्रहण करण्यात केले आहे. पुढील काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असे आता झालेल्या परिस्थितीवरून समजून येत आहे. हिवाळ्याचे दोन व उन्हाळ्याचे चार असे सहा महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी लहान - मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. यामुळे धरण क्षेत्रानजीकची पाणीपातळी वाढलेली नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने जमिनीची पाणी पातळी खालावली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच ग्रामीण भागात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर बोअरचे पाणी आटू लागत असल्याची स्थिती सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

...या तालुक्यात झाले अधिग्रहण

पाणीटंचाईची मागणी होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील ६, गेवराई तालुक्यातील ४, वडवणी तालुक्यातील ५ व धारुर तालुक्यातील ३ अशा एकूण १८ गावांमध्ये पाण्याचे स्रोत म्हणून विहिरी व बोअरचे अधिग्रहण झाले आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी