शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘जायकवाडी’तून येणार ‘माजलगाव’ला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:52 IST

जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देकॅबिनेटमध्ये मंजुरी : बीड, माजलगावसह ११ खेड्यांचा पाणीप्रश्नावर तोडगा; नागरिकांमध्ये समाधान

बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामुळे बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, अभियंता किरण देशमुख, राहुल टाळके यांनी धरणाची पाणीपातळी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढला आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही.हाच धागा पकडून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी धरणात आल्यावर बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा व माजलगाव धरणातील पाणी पातळी लक्षात घेता जायकवाडीतील पाणी पैठण उजवा कालव्यातून सोडण्याची मागणी केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी माजलगावला आल्यावर बीडसह माजलगाव शहर व ११ खेडी आणि परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, नगर परिषद बीड

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMajalgaon Damमाजलगाव धरण