शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

‘जायकवाडी’तून येणार ‘माजलगाव’ला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:52 IST

जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देकॅबिनेटमध्ये मंजुरी : बीड, माजलगावसह ११ खेड्यांचा पाणीप्रश्नावर तोडगा; नागरिकांमध्ये समाधान

बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामुळे बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, अभियंता किरण देशमुख, राहुल टाळके यांनी धरणाची पाणीपातळी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढला आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही.हाच धागा पकडून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी धरणात आल्यावर बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा व माजलगाव धरणातील पाणी पातळी लक्षात घेता जायकवाडीतील पाणी पैठण उजवा कालव्यातून सोडण्याची मागणी केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी माजलगावला आल्यावर बीडसह माजलगाव शहर व ११ खेडी आणि परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, नगर परिषद बीड

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMajalgaon Damमाजलगाव धरण