शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

‘जायकवाडी’तून येणार ‘माजलगाव’ला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:52 IST

जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देकॅबिनेटमध्ये मंजुरी : बीड, माजलगावसह ११ खेड्यांचा पाणीप्रश्नावर तोडगा; नागरिकांमध्ये समाधान

बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामुळे बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, अभियंता किरण देशमुख, राहुल टाळके यांनी धरणाची पाणीपातळी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढला आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही.हाच धागा पकडून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी धरणात आल्यावर बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा व माजलगाव धरणातील पाणी पातळी लक्षात घेता जायकवाडीतील पाणी पैठण उजवा कालव्यातून सोडण्याची मागणी केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी माजलगावला आल्यावर बीडसह माजलगाव शहर व ११ खेडी आणि परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, नगर परिषद बीड

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMajalgaon Damमाजलगाव धरण