शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

बीड जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:24 IST

जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित : ८६ प्रकल्प जोत्याखाली, २१ प्रकल्प कोरडे, उपायांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे. १५ आॅगस्टपासून तब्बल ४७ दिवस पाऊस न झाल्याने पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्हयातील सर्वच धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र उपलब्ध साठादेखील कमी असल्याने आॅक्टोबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने प्रशासनाला आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे. मात्र अद्यापही आॅक्टोबरमध्ये पाऊस होईल या भरवशावर हालचाली सुरु झाल्याचे दिसत नाही. पाऊस नाही, पिके गेली, धरणे कोरडी पडू लागली, पुढचा हंगामही धोक्यात आला अशा परिस्थितीकडे शासनाने गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे.बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६.३६ मिमी इतके आहे. मागील वर्षी ६०६. ७० मिमी पाऊस झाल्याने पीक परिस्थिती तसेच पाण्याची उपलब्धता होती. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिल्याने गंभीर संकटाची चाहुल शेतकºयांसह सर्वसामान्याला लागली आहे. जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मात्र यंदा माजलगाव धरणात पाणीसाठा नसल्यात जमा आहे. तर मांजरा धरणात १.२१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांवरच निम्म्या जिल्ह्याची भिस्त आहे. १६ मध्यम आणि १२६ लघु प्रकल्पांतील परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका, नगर पंचायतींनी पाणी पुरवठ्यात कपात करणे सुरु केले आहे.पाऊस नसल्याने बाजारही शांतपुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. उलाढाल थंडावली असून वर्दळ थांबल्यागत स्थिती पहायला मिळते.थोड्याफार पाण्यावर भाजी पिके घेणाºया शेतकºयांना बाजारात विक्रीसाठी येणे परवडत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.पुरेसे पाणी नसल्याने आहे ती बांधकामे थांबविण्याची वेळ आली आहे. आॅक्टोबरमध्ये पाऊस पडेल या आशेवर आभाळाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठामोठे २, मध्यम १६, लघु १२६१ मध्यम व ७ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के१ मोठा ,४ मध्यम, १८ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी१ मध्यम, ४ लघु प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त१ लघुप्रकल्पात ५० ते ७५ टक्के८ मध्यम, ७७ लघु प्रकल्प जोत्याखाली२ मध्यम १९ लघुप्रकल्प कोरडेसध्या उपलब्ध साठा ३७.७५७ दलघमीएकाही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नाही

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई