शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गारपीट, अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा

By शिरीष शिंदे | Updated: March 15, 2023 14:35 IST

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच आष्टी व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटचा इशारा

बीड : कृषी हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत मध्यम पाऊस व १४ ते १६ मार्च या कालावधीत बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच आष्टी व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटचा इशारा परभणी येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्राने दिला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवसांत मध्यम पाऊस व १४ ते १६ मार्च या कालावधीत बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई, हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, फळे आणि भाजीपाला यासारखी पिके लवकरात लवकर काढावीत. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी. पावसाची शक्यता तसेच वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या झाडांना आधार देण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपिटीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच मका पिकामध्ये अंतर मशागत करावी, असे आवाहन कृषी अधीक्षक जेजुरकर यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसBeedबीड