शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

बीड जिल्ह्यात सात लाख शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:49 IST

बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ अनुदान देऊन शेतक-यांना आधार देण्याची मागणी झाली होती. सरसकट अनुदान द्यावे, यासाठी आंदोलनही उभारले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अद्यापही ही घोषणा कागदावरच असून जिल्ह्यातील सात लाख शेतक-यांना या अनुदानाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची तीव्र लाट असून अनुदान देण्याची मागणी आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ अनुदान देऊन शेतक-यांना आधार देण्याची मागणी झाली होती. सरसकट अनुदान द्यावे, यासाठी आंदोलनही उभारले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अद्यापही ही घोषणा कागदावरच असून जिल्ह्यातील सात लाख शेतक-यांना या अनुदानाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची तीव्र लाट असून अनुदान देण्याची मागणी आहे.

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोन महिने झाले. परंतु अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बोंडअळीमुळे आगोदरच कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शासनाने ठरवलेला हमीभावही अत्यल्प होता. बोंडअळीच्या संकटामुळे खुल्या बाजारपेठेत देखील गतवर्षीपेक्षा भाव कमी होता. कापूस लागवडीवरील उत्पादन खर्च देखील निघाला नाही. एकीकडे बोंडअळीचे संकट व दुसरीकडे कमी भाव, आणि शासनाने न दिलेल्या अनुदानामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे.

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान देण्याची शासनाची इच्छाच नव्हती, अशी शेतकºयांमध्ये चर्चा आहे. कारण सुरूवातीला जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी फक्त १८ मंडळातील कापूस लागवडीचे पंचनामे करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यापुढे शासन नमले व जिल्ह्यात सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा कागदावरच असल्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नासंदर्भात शासन उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

पीकविमाही तात्काळ द्यावागतवर्षी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळाली होती. त्याच आशेने या वर्षी शेतकºयांनी स्वत: खिशातील पैसे घालून पीकविमा भरला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हक्काचे पीकविम्याचे पैसे देण्याची तात्काळ देण्याची मागणी होत आहे. हे पैसे वेळेत मिळाले तर येणाºया हंगामासाठी शेतकºयास मदत होणार आहे.

अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यावर प्रश्नचिन्हबोंडअळीने बाधित बागायती क्षेत्रास १३५०० रूपये अनुदान आहे. तर जिरायत क्षेत्रासाठी ६८०० रुपये. जिल्ह्यातील अंबाजोगई तालुक्यात फक्त ६१.५ एवढे बागायती क्षेत्र दाखवण्यात आले आहे. तर बाकी सर्व तालुक्यात ३७७६९२.२ हेक्टर क्षेत्र जिरायत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पंचनामे करणाºया अधिकाºयांनी पारदर्शक कारभार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनी केलेल्या पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसMarathwadaमराठवाडाagricultureशेती