शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:37 IST

अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये तीव्र संताप : अनुदानाचा तिसरा हप्ता पाठवण्याचा शासनाला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रदुर्भावामुळे कापूस क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी बोंडअळी अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र तिस-या टप्प्यातील ८५.१३ कोटी अनुदान अजूनही न मिळाल्यामुळे अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.खरिप संपून रब्बी हंगाम सुरु झाला आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मागील वर्षी झालेल्या बोंडअळी अनुदानाची जाहीर केलेली रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे, शासनाला बोंडअळी अनुदानाच्या तिसºया हप्त्याचा विसर पडला आहे का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मिळालेल्या अनुदानाची रक्कम शेतकºयांना योग्य पद्धतिने वाटप होत नाही, इतर बँकेकडून पैसे मिळत नसल्याचे सांगून जिल्हा बँकेकडून अडवणूक केली जात आहे. अशी महिती शेतकºयांनी दिली.शासनाने बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्पा जून महिन्यात ६८.२३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर जूलै महिन्यात दुसरा हप्ता १०२ कोटी ६४ लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात आले. यामध्ये पात्र असलेल्या अनेक गावातील शेतकºयांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यतील संपूर्ण रक्कम त्वरीत शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावी, व तिसºया टप्प्यातील अनुदानाचे ८५.१३ कोटी रक्कम वाटपासाठी जिल्हा बँकेकडे न देता राष्ट्रीयकृत बँकेकडे देण्यात यावी अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.३ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला होता प्रादुर्भावजिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण हे कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोडअळी प्रदुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार हेक्टरवरील कापूस पिक धोक्यात आले व शेतकºयाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीcottonकापूस