शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जायभायवाडीने दाखविली परिवर्तनाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार अनिल महाजन धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी ...

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार

अनिल महाजन

धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी कामगारांचे गाव ही ओळख पुसण्यासाठी पाणी फाउंडेशनचे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या जायभायवाडी गावाचे रूपडे बदलत आहे. सलग तीन वर्षे श्रमदानातून एकजुटीचे सातत्य राखत साधलेले परिवर्तन इतर गावांना मार्गदर्शक ठरत आहे. येत्या काही वर्षांत कोयतामुक्तीचा संकल्प जायभायवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यातील डोंगरकुशीतील जायभायवाडी बारमाही दुष्काळी असणारी. पन्नास कुटुंबाच्या या वाडीची लोकसंख्या साडेचारशेच्या घरात आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाचा पेरा घ्यायचा आणि पुढचे सहा महिने ऊसतोडणीला जायचे, हे ठरलले. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. हाताला दुसरा कुठलाच उद्योगधंदा नव्हता.

२०१७ मध्ये पाणी फाउंडेशनची वाॕॅटर कप स्पर्धा आली. यात सहभागी होत ग्रामस्थांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला. एकजुटीने श्रमदानातून गावाचे चित्रच पालटले. ग्रामस्थांची तळमळ पाहून मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना व या भागातील नागरिकांनी तन, मन व धनाचे बळ दिल्याने गावात जलसंधारण चळवळ यशस्वी झाली. गावाच्या कार्यक्षेत्रातील थेंबभर पाणीदेखील बाहेर जाणार नाही व ते जमिनीत मुरवण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रशुद्ध कामे केली. लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले. सतत तीन वर्षे हे काम केल्याने गावपरिसरात पाणी पातळी वाढली. फळबागा फुलत आहेत. पशुधनाची संख्यादेखील वाढली आहे. दहा ते बारा कुटुंबांचा कोयताही सुटला आहे. शाळेचा कायापालट झाला आहे. महिला व पुरुषाचे आठ बचत गट असून या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक मदत होत आहे. पाणीदार बनलेल्या जायभायवाडीचे परिवर्तन तालुक्यातील इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

वाॕॅटर कप पूर्वीची वाडी

गावात एकही फळबाग नव्हती, रबीचे क्षेत्र अत्यल्प होते. ५० पैकी ४५ कुटुंब ऊसतोडणी करणारे होते. फक्त ८ कुटुंबच शेळीपालन करीत. खवा उत्पादन मोजकेच होते.

वाॕॅटर कपनंतरची फलश्रुती

गावात आठ ते दहा शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. रबी क्षेत्रात ५० हेक्टरच्या आसपास वाढ झाली. दहा कुटुंबांच्या हातातील कोयता सुटला. शेळीपालन वाढले. प्रत्येक कुटुंबाकडे ३०० पेक्षा जास्त शेळ्या आहेत. रोज २०० किलो खवा उत्पादन येथे होत आहे.