शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जायभायवाडीने दाखविली परिवर्तनाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार अनिल महाजन धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी ...

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार

अनिल महाजन

धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी कामगारांचे गाव ही ओळख पुसण्यासाठी पाणी फाउंडेशनचे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या जायभायवाडी गावाचे रूपडे बदलत आहे. सलग तीन वर्षे श्रमदानातून एकजुटीचे सातत्य राखत साधलेले परिवर्तन इतर गावांना मार्गदर्शक ठरत आहे. येत्या काही वर्षांत कोयतामुक्तीचा संकल्प जायभायवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यातील डोंगरकुशीतील जायभायवाडी बारमाही दुष्काळी असणारी. पन्नास कुटुंबाच्या या वाडीची लोकसंख्या साडेचारशेच्या घरात आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाचा पेरा घ्यायचा आणि पुढचे सहा महिने ऊसतोडणीला जायचे, हे ठरलले. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. हाताला दुसरा कुठलाच उद्योगधंदा नव्हता.

२०१७ मध्ये पाणी फाउंडेशनची वाॕॅटर कप स्पर्धा आली. यात सहभागी होत ग्रामस्थांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला. एकजुटीने श्रमदानातून गावाचे चित्रच पालटले. ग्रामस्थांची तळमळ पाहून मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना व या भागातील नागरिकांनी तन, मन व धनाचे बळ दिल्याने गावात जलसंधारण चळवळ यशस्वी झाली. गावाच्या कार्यक्षेत्रातील थेंबभर पाणीदेखील बाहेर जाणार नाही व ते जमिनीत मुरवण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रशुद्ध कामे केली. लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले. सतत तीन वर्षे हे काम केल्याने गावपरिसरात पाणी पातळी वाढली. फळबागा फुलत आहेत. पशुधनाची संख्यादेखील वाढली आहे. दहा ते बारा कुटुंबांचा कोयताही सुटला आहे. शाळेचा कायापालट झाला आहे. महिला व पुरुषाचे आठ बचत गट असून या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक मदत होत आहे. पाणीदार बनलेल्या जायभायवाडीचे परिवर्तन तालुक्यातील इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

वाॕॅटर कप पूर्वीची वाडी

गावात एकही फळबाग नव्हती, रबीचे क्षेत्र अत्यल्प होते. ५० पैकी ४५ कुटुंब ऊसतोडणी करणारे होते. फक्त ८ कुटुंबच शेळीपालन करीत. खवा उत्पादन मोजकेच होते.

वाॕॅटर कपनंतरची फलश्रुती

गावात आठ ते दहा शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. रबी क्षेत्रात ५० हेक्टरच्या आसपास वाढ झाली. दहा कुटुंबांच्या हातातील कोयता सुटला. शेळीपालन वाढले. प्रत्येक कुटुंबाकडे ३०० पेक्षा जास्त शेळ्या आहेत. रोज २०० किलो खवा उत्पादन येथे होत आहे.