शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

जायभायवाडीने दाखविली परिवर्तनाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार अनिल महाजन धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी ...

दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार

अनिल महाजन

धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी कामगारांचे गाव ही ओळख पुसण्यासाठी पाणी फाउंडेशनचे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या जायभायवाडी गावाचे रूपडे बदलत आहे. सलग तीन वर्षे श्रमदानातून एकजुटीचे सातत्य राखत साधलेले परिवर्तन इतर गावांना मार्गदर्शक ठरत आहे. येत्या काही वर्षांत कोयतामुक्तीचा संकल्प जायभायवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यातील डोंगरकुशीतील जायभायवाडी बारमाही दुष्काळी असणारी. पन्नास कुटुंबाच्या या वाडीची लोकसंख्या साडेचारशेच्या घरात आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाचा पेरा घ्यायचा आणि पुढचे सहा महिने ऊसतोडणीला जायचे, हे ठरलले. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. हाताला दुसरा कुठलाच उद्योगधंदा नव्हता.

२०१७ मध्ये पाणी फाउंडेशनची वाॕॅटर कप स्पर्धा आली. यात सहभागी होत ग्रामस्थांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला. एकजुटीने श्रमदानातून गावाचे चित्रच पालटले. ग्रामस्थांची तळमळ पाहून मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना व या भागातील नागरिकांनी तन, मन व धनाचे बळ दिल्याने गावात जलसंधारण चळवळ यशस्वी झाली. गावाच्या कार्यक्षेत्रातील थेंबभर पाणीदेखील बाहेर जाणार नाही व ते जमिनीत मुरवण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रशुद्ध कामे केली. लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले. सतत तीन वर्षे हे काम केल्याने गावपरिसरात पाणी पातळी वाढली. फळबागा फुलत आहेत. पशुधनाची संख्यादेखील वाढली आहे. दहा ते बारा कुटुंबांचा कोयताही सुटला आहे. शाळेचा कायापालट झाला आहे. महिला व पुरुषाचे आठ बचत गट असून या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक मदत होत आहे. पाणीदार बनलेल्या जायभायवाडीचे परिवर्तन तालुक्यातील इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

वाॕॅटर कप पूर्वीची वाडी

गावात एकही फळबाग नव्हती, रबीचे क्षेत्र अत्यल्प होते. ५० पैकी ४५ कुटुंब ऊसतोडणी करणारे होते. फक्त ८ कुटुंबच शेळीपालन करीत. खवा उत्पादन मोजकेच होते.

वाॕॅटर कपनंतरची फलश्रुती

गावात आठ ते दहा शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. रबी क्षेत्रात ५० हेक्टरच्या आसपास वाढ झाली. दहा कुटुंबांच्या हातातील कोयता सुटला. शेळीपालन वाढले. प्रत्येक कुटुंबाकडे ३०० पेक्षा जास्त शेळ्या आहेत. रोज २०० किलो खवा उत्पादन येथे होत आहे.