शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना विकास हवा असतो; चूक झाल्यास विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:03 IST

मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : पाणी, वीज, रस्त्यांसाठी प्रयत्न राहणार

बीड : लोकशाहीत मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. विकासाच्या मुद्यावर कुणी मत मागत नाही तर पोरखेळ वृत्तीने झिरो असणारे हिरो होण्याचा प्रयत्न करतात. मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. मंगळवारी सायंकाळी बार्शी नाका, परिसरात जाहीर सभेत ते बोलत होते.बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले की, एक अभ्यासू व विचारसंपन्न नेतृत्व म्हणून अण्णांना निवडून द्या. सर्व सामाजातील मतदार अण्णांवर खुल्या मनाने प्रेम करतो. जयदत्त क्षीरसागर यांना मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सरकारच्या योजना आणून राबवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करावा लागतो. पाणी, वीज, सडक या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करुन ही कामे होत असल्याचे ते म्हणाले.या वेळी बार्शीनाका, अशोक नगर, इमामपूर रोड परिसरातील शिवसैनिक, महिला, नागरिक, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल जगताप, प्रा.जगदीश काळे, बप्पासाहेब घुगे, बाळासाहेब आंबुरे, नितीन धांडे, सुशील पिंगळे, गोरख शिंगन, संजय उडान, लक्ष्मण विटकर, सागर बहीर, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, दिनकर कदम, विलास बडगे, सुनील सुरवसे, सुधीर भांडवले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी परिसरात कॉर्नर बैठकबीड : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवर जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी, शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक झाली. यावेळी सर्जेराव तांदळे म्हणाले की, राष्ट्रवादीने महिला उमेदवार दिला नाही, सर्वच क्षेत्रात महिलांना प्राधान्य द्यायला हवे, पण त्यांना महिलांचे महत्त्व वाढवायचे नव्हते. आम्ही बीड जिल्ह्यात दोन जागांवर महिला उमेदवार निवडणार आहोत.विनोद मुळूक म्हणाले, अण्णांच्या व अध्यक्षांच्या पाठपुराव्यामुळे शहरातली कामे चालू आहेत. ती भविष्यासाठी बीडकरांना मोकळा श्वास देणारी ठरणार आहेत. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीडची पुढची दिशा काय असावी, बीड कसं असावं याचा विचार महत्त्वाचा आहे. शहराचे आणि समाजाचे हित कशात आहे, हे बीडचा मतदार चांगले ओळखतो. त्यामुळे आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना