शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदारांना विकास हवा असतो; चूक झाल्यास विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:03 IST

मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : पाणी, वीज, रस्त्यांसाठी प्रयत्न राहणार

बीड : लोकशाहीत मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. विकासाच्या मुद्यावर कुणी मत मागत नाही तर पोरखेळ वृत्तीने झिरो असणारे हिरो होण्याचा प्रयत्न करतात. मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. मंगळवारी सायंकाळी बार्शी नाका, परिसरात जाहीर सभेत ते बोलत होते.बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले की, एक अभ्यासू व विचारसंपन्न नेतृत्व म्हणून अण्णांना निवडून द्या. सर्व सामाजातील मतदार अण्णांवर खुल्या मनाने प्रेम करतो. जयदत्त क्षीरसागर यांना मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सरकारच्या योजना आणून राबवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करावा लागतो. पाणी, वीज, सडक या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करुन ही कामे होत असल्याचे ते म्हणाले.या वेळी बार्शीनाका, अशोक नगर, इमामपूर रोड परिसरातील शिवसैनिक, महिला, नागरिक, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल जगताप, प्रा.जगदीश काळे, बप्पासाहेब घुगे, बाळासाहेब आंबुरे, नितीन धांडे, सुशील पिंगळे, गोरख शिंगन, संजय उडान, लक्ष्मण विटकर, सागर बहीर, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, दिनकर कदम, विलास बडगे, सुनील सुरवसे, सुधीर भांडवले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी परिसरात कॉर्नर बैठकबीड : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवर जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मित्रनगर, दत्तनगर, चाणक्यपुरी, शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक झाली. यावेळी सर्जेराव तांदळे म्हणाले की, राष्ट्रवादीने महिला उमेदवार दिला नाही, सर्वच क्षेत्रात महिलांना प्राधान्य द्यायला हवे, पण त्यांना महिलांचे महत्त्व वाढवायचे नव्हते. आम्ही बीड जिल्ह्यात दोन जागांवर महिला उमेदवार निवडणार आहोत.विनोद मुळूक म्हणाले, अण्णांच्या व अध्यक्षांच्या पाठपुराव्यामुळे शहरातली कामे चालू आहेत. ती भविष्यासाठी बीडकरांना मोकळा श्वास देणारी ठरणार आहेत. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीडची पुढची दिशा काय असावी, बीड कसं असावं याचा विचार महत्त्वाचा आहे. शहराचे आणि समाजाचे हित कशात आहे, हे बीडचा मतदार चांगले ओळखतो. त्यामुळे आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना