शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

‘विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:26 IST

मल्हारीकांत देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला ...

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनात प्रथमच गझलकारांच्या रचनांनी तरुणाईला भरती

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला युवा महोत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. सळसळती तरुणाई व दर्जेदार झालेले सादरीकरण यामुळे गझलनगरीत पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. रसिकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणून या संमेलनाने नोंद घ्यावी, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली होती. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच मराठी गझलला व्यासपीठ मिळाल्यामुळे तरुण गझलकारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रोत्यांमध्ये तरुणींसह महिलांची उपस्थिती व सहभाग हे या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.लातूर येथील प्रा. संतोष कुलकर्णी यांची‘मराठी गझल पुढे जात आहे,मराठीसही ती पुढे नेते आहे’गझलेला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.दास पाटील, योगिता पाटील यांच्याही गझला उत्तम होत्या. नांदेड येथील प्रफुल्ल कुलकर्णी यांनी‘मोठ्याला मोठे म्हणण्याला धीर हवागुन्हा नको, आरोप तरी गंभीर हवा’हा शेर सादर करीत दाद मिळविली. सुहासिनी देशमुख यांनी‘तुझ्या भोवती खुळा पाश आहेक्षणाचा विसावा पुन्हा नाश आहेनको दोन डगरींवर पाय आताअशा वागण्यात पुरा नाश आहे...’ही गझल सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.सेलू येथील संजय विटेकरांनी,‘वयाने जरासा ढळू लागलोतसा मी मला कळू लागलो...’ही गझल सादर केली. उदगीर येथील शिव डोईजोडे या युवकानेती डोळ्याने बोलत गेलीमी नंतर भाषांतर केलेरंगत आली कथा नेमकीउगीच का मध्यंतर झाले...म्हणताच उपस्थित युवांनी जल्लोष केला.कळंब येथील सचिन क्षीरसागर यांनी‘युगायुगांचा त्रास हाटिपेला गेला वाटतोविठ्ठलाचा भार या विटेला वाटतो’ही मार्मिक गझल ऐकवली.प्रा. शेखर गिरी यांनी,दाबून तोंड माझे, पाठीत वार झालामजला छळावयाचाऐसा प्रकार झालामाझी तशी सुपारीकोणीच घेत नव्हतेमाझाच दोस्त सालातेव्हा तयार झाला’अशी कोटी सादर केली.उस्मानाबाद येथील बाळ पाटील या युवकाच्या‘हसू वाटते, पण हसू देत नाहीजखम ही ‘मुळाची’ बसू देत नाहीसदा काश्मिराचा नकाशा मुखावरकधी तो खुशाली असू देत नाही’या व्यंगात्मक गझलेने उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी उडालीनांदेड येथील अरविंद सगर या युवकाने,‘गळी लागला तो विषारी निघालातिचा चेहराही शिकारी निघालाआता माकडाचे बघून सर्व चाळेदिली ज्या सत्ता, तो मदारी निघाला’हे राजकीय व्यंग गझलेतून मांडले.रवींद्र केसकर या गझलकाराने‘कोणी गुलाम झाला,कोणी ‘आमिर’ झालाज्याला न जात काही,तो कबीर झाला’असे सामाजिक आशयाचे शेर सादर केले.बडवणी येथील सतीश दराडे यांनी,आतल्या कोलाहलाला,बांग देता येत नाहीगाढ निद्रेतून हल्ली,जाग येता येत नाही’अशी गझल सादर केली.वैभव देशमुख या युवकाने,‘संबंध कधी मी आपला,कुणाला सांगत नाहीगंध तुझ्या प्रेमाचा,या उरात मावत नाहीसूर्याभोवती फिरती ही धरा,किती युगांचीहा सूर्य मिठी एखादीका देऊन टाकीत नाही’अशी शृंगारिक रचना सादर केली.राज पठाण, प्रथमेश तुगावकर, विजय आव्हाड, योगीराज माने यांच्या गझलांना उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.गझल संमेलनाची सांगता औरंगाबाद येथील डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या‘बोलतो मराठी, ऐकतो मराठीहीच माय माझी, मानतो मराठीजन्मलो येथे मी भारतीय मुस्लिमरोज रोज मी दुवाही मागतो मराठी’या गझलेने कार्यक्रमाची सांगता झाली.

सचिन क्षीरसागर ठरला हिरोकळंब येथील अल्पशिक्षित सचिन क्षीरसागर हा युवक उदरनिर्वाहासाठी पानटपरी चालवितो. या युवकाचे सादरीकरण उपस्थितांना मनोमन भावले. राजकीय व्यंग टिपताना तो म्हणतो,चालते फुरफुर कुणाची, तर कुणी खिंकाळतोसंसदेचा हॉल आज घोड्याचा तबेला वाटतोजातिधर्माचे वाढतो स्तोम व्यक्त करताना त्याच्या ओळी लक्षणीय होत्या...लटकतो खोपा कुठे, कुठे हिरवा कुठे भगवा, निळापाखरांनी आज जातीवाद केला वाटतो’सचिनच्या प्रभावी सादरीकरणामुळे तो गझल संमेलनाचा ‘हिरो’ ठरला.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन