शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

विष्णू भागवतला दहा दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा ...

परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू भागवत याला ८ फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. भागवत याला अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परळी येथील माउली मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या पतसंस्थेत पैसे गुंतवले होते. मात्र, मुदत ठेवीची मुदत संपूनदेखील व्याज व मुद्दल परत देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, २०१९ मध्ये पतसंस्था बंद पडली, ठेवीदारांनी मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांना व्याज व मुद्दल परत मिळावी यासाठी संपर्क केला. मात्र, पैसे देण्यास पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे ठेवीदार अरुण मुळे (रा. नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्यासह एकूण १४ ठेवीदारांनी परळी शहर ठाण्यात एक कोटी २८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल आणि विष्णू रामचंद्र भागवत (रा. वंडगाव, ता. येवला, जि. नाशिक) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास बीड आर्थिक गुन्हे शाखा करत होती. आर्थिक गुन्हे शाखेने चेअरमन ओमनारायण जैस्वाल याला वाळूज येथील फ्लॅटमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून, संगीता जैस्वाल फरार आहे. दरम्यान, तिसरा आरोपी विष्णू भागवत हा नाशिक कारागृहात होता. त्याला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून तपासकामी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी भागवत याला पुढील तपासासाठी परळी पोलीस ठाण्याच्य ताब्यात दिले आहे. पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.

पतसंस्थांचे गुन्हे होणार उघड

जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेच्या संचालक मंडळांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा गुन्ह्यांचा तपास युद्ध पातळीवर करण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्हे मार्गी लागणार आहेत. या कारवायांमुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.