शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विष्णू भागवतला दहा दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा ...

परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू भागवत याला ८ फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. भागवत याला अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परळी येथील माउली मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या पतसंस्थेत पैसे गुंतवले होते. मात्र, मुदत ठेवीची मुदत संपूनदेखील व्याज व मुद्दल परत देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, २०१९ मध्ये पतसंस्था बंद पडली, ठेवीदारांनी मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांना व्याज व मुद्दल परत मिळावी यासाठी संपर्क केला. मात्र, पैसे देण्यास पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे ठेवीदार अरुण मुळे (रा. नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्यासह एकूण १४ ठेवीदारांनी परळी शहर ठाण्यात एक कोटी २८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल आणि विष्णू रामचंद्र भागवत (रा. वंडगाव, ता. येवला, जि. नाशिक) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास बीड आर्थिक गुन्हे शाखा करत होती. आर्थिक गुन्हे शाखेने चेअरमन ओमनारायण जैस्वाल याला वाळूज येथील फ्लॅटमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून, संगीता जैस्वाल फरार आहे. दरम्यान, तिसरा आरोपी विष्णू भागवत हा नाशिक कारागृहात होता. त्याला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून तपासकामी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी भागवत याला पुढील तपासासाठी परळी पोलीस ठाण्याच्य ताब्यात दिले आहे. पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.

पतसंस्थांचे गुन्हे होणार उघड

जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेच्या संचालक मंडळांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा गुन्ह्यांचा तपास युद्ध पातळीवर करण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्हे मार्गी लागणार आहेत. या कारवायांमुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.