शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

राजकीय वादातून तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : तालुक्यातील बाभूळवाडी- बेलवाडी गावातील राजकीय वातावरण तापले आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या शुल्लक वादातून दोन गटांत तुंबळ ...

बीड : तालुक्यातील बाभूळवाडी- बेलवाडी गावातील राजकीय वातावरण तापले आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या शुल्लक वादातून दोन गटांत तुंबळ वाद झाला असून, गावातील वादाप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात, तर बीड येथे झालेल्या प्रकारावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोन्ही गटांतील आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अंकुश कचरू सातपुते (रा. बाभूळवाड) यांच्या फिर्यादीनुसार गणेश सातपुते यांच्या हॉटेलवर गुरुवारी रात्री ८ वाजता दगडफेक करण्यात आली. ही माहिती कळल्यानंतर अंकुश सातपुते दुचाकीवरून हॉटेलकडे जात होते. यावेळी दादासाहेब खिंडकर, समाधान खिंडकर, ज्योतीराम भटे, कुंडलिक भटे, महादेव मातकर, शहादेव मातकर, मोतीराम मातकर, लक्ष्मण सातपुते, बाबू मातकर, चव्हाण, अमोल ढेपाळे (सर्व रा. बेलवाडी) व शंकर कदम (ईट, ता. बीड) हे जवळ आले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच गळ्याला तलवार लावून १० हजार रुपये काढून घेतले व दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केले.

तर महादेव मातकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे परमेश्वर सातपुते, अंकुश सातपुते, हनुमान सातपुते, अशोक सातपुते, केशव निर्धार, राम शिंदे, उत्तरेश्वर भटे, गोरख भटे, कृष्णा सातपुते, अंबादास सातुपते, लहू भटे, महादेव शिंदे, कचरू सातपुते, सखाराम भटे, आसाराम भटे, (सर्व रा. बाभूळवाडी, ता. बीड) जालिंदर भटे, राजेंद्र सातपुते (दोघे रा. बेडकुचीवाडी) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न व दरोड्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. शरद भुतेकर यांनी याप्रकरणी घटनास्थळी पाहणी केली असून, तपास सुरू असल्याचे सांगितले.

शिवाजीगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेलवाडी, बाभूळवाडी, बेडकुचीवाडी या ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंच अश्विनी खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर सातपुते याने २९ जानेवारी रोजी डोक्याला पिस्टल लावले व मिनी गंठन हिसकावून घेतले, तसेच रोख रक्कम चोरून नेली असा गुन्हा दाखल कले आहे. तर, परमेश्वर सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरावर २८ रोजी उशिरा १३ जणांनी सशस्त्र हल्ला हल्ला करून १ लाख रोख व २ तोळे सोने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांत शिवाजीनगर व पिंपळनेर पोलीस तपास करत असून, आरोपी अजूनदेखील फरार आहेत.