शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कोरोना नियमांचे उल्लंघन; एक कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ...

बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ते मेअखेरपर्यंत जवळपास ५० हजार कारवाया वाहतूक शाखेकडून करण्यात आल्या असून, जवळपास एक कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे कोरोना संसर्ग थांबविण्यासदेखील प्रशासनास काही प्रमाणात यश आले आहे. यामध्ये नगरपालिकेसोबत मिळून विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली होती.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक होती. अनेक निर्बंध घालण्यात आले होते. विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे ‌आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेकजण विनाकारण गाडी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. यावेळी केलेल्या कारवायांमुळे आवश्यक नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या निश्चित कमी झाली होती. मात्र, दुचाकीस्वारांना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्यामुळे अनेक ठिकाणावरून तीव्र संतापदेखील पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध पाहायला मिळाला होता.

या अडीच महिन्यात ट्रिपल सिट, विनामास्क, नो पार्किंग, विनापरवाना यासह विविध कारणास्तव जवळपास ५० हजार केसेस करण्यात आल्या. यावेळी नियम मोडणाऱ्यांकडून एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अजूनदेखील कारवाया सुरूच असून, किमान दुचाकीस्वारांची परिस्थिती पाहून किंवा सर्वांगीण विचार करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अनेकवेळा फक्त ग्रामीण भागातील वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोबाइलवर बोलणे - १३००

ट्रिपल सिट ११००

विनाहेल्मेट १२००

नो पार्किंग १७००

नंबर प्लेटसंदर्भात कारवाई ९००

विनापरवाना वाहन चालवणे ९००

नो पार्किंग, मोबाइल बोलणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया

एप्रिल व मे महिन्यात नो पार्किंमध्ये वाहन उभे करणे व मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील दंडात्मक कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरू लागले आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार केसेस

मोटार वाहन कायद्यानुसार सर्वाधिक ५० हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व माध्यमातून जवळपास एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. या कारवायांमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यामुळे अपघात टाळता येतात. त्यामुळे सर्व नियमांचे पालन व्हावे, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यात मदत होत आहे.

कैलास भारती, वाहतूक शाखाप्रमुख, बीड

===Photopath===

220621\22_2_bed_2_22062021_14.jpg

===Caption===

वाहतूक शाखा