शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे बंदनंतर विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:42 IST

मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.

ठळक मुद्देप्रतिकुलतेवर मात : ४० दिवसांत १ लाख मे. टन उसाचे गाळप, टनामागे २१०० चे बील

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.अंबासाखर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन चेअरमन रमेश आडसकर यांनी शेतक-यांच्या मालकीचा हा प्रकल्प काटकसरीने चालवत शेतक-यांचे हित साधले आहे. कुठल्याही वित्तीय संस्थेचे व बँकेचे सहकार्य न घेता अंबासाखर चालू केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात चाळीस दिवसात अंबासाखरने १ लाख मे. टन ऊसाचे गाळप केले आहे.तसेच १५ डिसेंबरपर्यंत कारखान्याकडे आलेल्या उसाचे बील प्रतिटन २१०० रुपयप्रमाणे शेतक-यांना अदा केले आहेत. त्याबद्दल चेअरमन रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या कामाबद्दल ऊस उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.कारखाना यशस्वीरित्या चालविण्यासाठी आडसकर यांना उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा. वसंत चव्हाण, दाजीसाहेब लोमटे, अनंतराव पाटील, जनार्दन माने, वसंतराव हारे,शिवराम कदम, अजय ढगे पाटील, बब्रुवान खुळे, औंदुबर शिंदे, तानाजी देशमुख, तुळशीराम राऊत, श्रीराम मुंडे, सुनिल शिंदे, निवृत्ती चेवले, अ‍ॅड. प्रमोद जाधव, मारोती साळुंके, अशोक गायकवाड, सुमनबाई चौधरी, पुनम नांदवटे, विभागप्रमुख सुरेश साखरे, एम. डी. सोनवणे, यु. बी. माळी, जी. एम. चव्हाण, आर. आर. देशमुख, कर्मचारी, शेतकी विभाग, मुकादम, ऊसतोड मजुरांचे सहकार्य मिळत आहे.शेतकरी, कर्मचारी व संचालकांचे सहकार्यदिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांनी शेतक-यांच्या हिताची व मालकीची ही संस्था जपण्यासाठी व तिच्या विकासासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्याच विचाराने विद्यमान संचालक काम करीत आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केल्याचे चेअरमन रमेश आडसकर म्हणाले.