शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे बंदनंतर विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:42 IST

मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.

ठळक मुद्देप्रतिकुलतेवर मात : ४० दिवसांत १ लाख मे. टन उसाचे गाळप, टनामागे २१०० चे बील

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.अंबासाखर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन चेअरमन रमेश आडसकर यांनी शेतक-यांच्या मालकीचा हा प्रकल्प काटकसरीने चालवत शेतक-यांचे हित साधले आहे. कुठल्याही वित्तीय संस्थेचे व बँकेचे सहकार्य न घेता अंबासाखर चालू केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात चाळीस दिवसात अंबासाखरने १ लाख मे. टन ऊसाचे गाळप केले आहे.तसेच १५ डिसेंबरपर्यंत कारखान्याकडे आलेल्या उसाचे बील प्रतिटन २१०० रुपयप्रमाणे शेतक-यांना अदा केले आहेत. त्याबद्दल चेअरमन रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या कामाबद्दल ऊस उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.कारखाना यशस्वीरित्या चालविण्यासाठी आडसकर यांना उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा. वसंत चव्हाण, दाजीसाहेब लोमटे, अनंतराव पाटील, जनार्दन माने, वसंतराव हारे,शिवराम कदम, अजय ढगे पाटील, बब्रुवान खुळे, औंदुबर शिंदे, तानाजी देशमुख, तुळशीराम राऊत, श्रीराम मुंडे, सुनिल शिंदे, निवृत्ती चेवले, अ‍ॅड. प्रमोद जाधव, मारोती साळुंके, अशोक गायकवाड, सुमनबाई चौधरी, पुनम नांदवटे, विभागप्रमुख सुरेश साखरे, एम. डी. सोनवणे, यु. बी. माळी, जी. एम. चव्हाण, आर. आर. देशमुख, कर्मचारी, शेतकी विभाग, मुकादम, ऊसतोड मजुरांचे सहकार्य मिळत आहे.शेतकरी, कर्मचारी व संचालकांचे सहकार्यदिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांनी शेतक-यांच्या हिताची व मालकीची ही संस्था जपण्यासाठी व तिच्या विकासासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्याच विचाराने विद्यमान संचालक काम करीत आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केल्याचे चेअरमन रमेश आडसकर म्हणाले.